शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी काळात ७१ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:14 IST

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदीचा उपाय लागू केला. २४ मार्चपासून जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. या ...

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदीचा उपाय लागू केला. २४ मार्चपासून जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीत आता ५ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. संचारबंदीच्या आतापर्यंतच्या दहा दिवसांच्या काळामध्ये तब्बल ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंता वाढत आहेत. या काळात १ एप्रिल रोजी सर्वाधिक ११ रुग्ण दगावले, तर २८ मार्च रोजी १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संचारबंदीच्या १० दिवसांच्या काळात ३ हजार ९४३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. रुग्णांची संख्या एवढ्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाचा संसर्ग चिंताजनक वळणावर पोहोचलो आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या आणि मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी स्वतःहून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

१९४२ रुग्णांची कोरोनावर मात

संचारबंदी काळात १ हजार ९४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण नोंद होण्याच्या संख्येपेक्षाही कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. ३१ मार्च रोजी सर्वाधिक ३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर २ एप्रिल रोजी ३१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.