शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सार्वजनिक विहिरींची ७० कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST

परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाला पाणी टंचाईचे नियोजन करून ग्रामस्थांना बोअर, विहीर अधिग्रहण करून ...

परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाला पाणी टंचाईचे नियोजन करून ग्रामस्थांना बोअर, विहीर अधिग्रहण करून पाणी पुरवावे लागते. यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर घेण्यास मंजुरी दिली. विशेष म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या विहीर खोदण्यास मान्यता देण्यात आली. त्यासाठी ६ लाख ९८ हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील ७१८ ग्रामपंचायतीने रोजगार हमी योजना कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले. या कार्यालयाने प्रस्तावांची छाननी करून ५४७ प्रस्तावांना तांत्रिक मान्यता दिली. २०१९-२०२० मध्ये सुरू झालेली ही योजना अद्यापही परभणी जिल्ह्यात संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ ७० विहिरी भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले आहेत. यामध्ये गंगाखेड तालुक्यात ५,जिंतूर तालुक्यात १७,मानवत ५, पालम ५, पाथरी ४, पूर्णा १२, सेल ४ तर सोनपेठ तालुक्यातील ३ विहिरींची कामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे उर्वरित गावातील विहिरींची कामे अर्धवट आहेत. काही गावातील विहिरींना अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे विभागीय कार्यालयाच्या वतीने ज्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. त्या उद्देशाला परभणी जिल्ह्यात हरताळ फासण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विहिरींची कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

१७३ विहिरींना लागले पाणी

सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींची कामे सध्या स्थितीत जिल्ह्यात ३३३ ठिकाणी सुरू आहेत. ७० विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. तर १७३ विहिरींना पाणी लागले आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील १७३ गावातील पाणीटंचाई मिटण्यास हातभार लागणार आहे. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील १८ तर परभणी तालुक्यातील २२ गावांचा समावेश आहे.