शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसईचे ५२१ विद्यार्थी परीक्षा न देता होणार पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST

राज्यासह देशभरात कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी ...

राज्यासह देशभरात कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेतला आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील सीबीएसई बोर्डाच्या विविध शाळांमधील ५२१ विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यामध्ये ३२५ मुले तर १९६ मुलींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असला तरी या निर्णयाबाबत अनेक पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पद्धत असणे अत्यंत आवश्यक आहे. परीक्षा नसतील तर विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी कळणार? असा सवाल काही पालक व शिक्षण तज्ज्ञांमधून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे काही पालकांनी या निर्णयाचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे.

११ वी/आयटीआय प्रवेश कसे होणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा न देताच दहावीच्या परीक्षा रद्द केल्याने ११ वी प्रवेश होणार असले तरी आयटीआय व इतर अभ्यासक्रमाला प्रवेश कसे देण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष लागले आहे.

नापास न करण्याचा यापूर्वी झाला होता निर्णय

सीबीएसई बोर्डाच्या निर्णयानुसार दहावीच्या परीक्षेत पास किंवा नापास हे ठरविण्यासाठी परीक्षेच्या सर्व विषयांपैकी फक्त ५ विषय ज्यात सर्वाधिक गुण मिळाले आहेत. त्याचा विचार करून पाच विषयात पास म्हणजेच दहावी पास, असा निर्णय यापूर्वी झाला आहे.

सीबीएसईचा निर्णय अयोग्य आहे. कारण उच्च दर्जाच्या शिक्षण पद्धतीत यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची कमी होईल. परीक्षेचे महत्त्व वाटणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी परीक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करावा.

- प्रा. प्रमोद ढालकरी, पालक.

दहावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. परीक्षा न झाल्यास विद्यार्थ्याची बुद्धीमत्ता कशी समजेल? वर्षभर अभ्यास करावा लागतो. त्यातूनच यश मिळते, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रूजली पाहिजे. सीबीएसई बोर्ड असा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करीत आहे.

- दादाराव ताठे, पालक.

कोरोनाची स्थिती सर्वत्र गंभीर आहे, हे मान्य आहे; परंतु थेट परीक्षाच रद्द करणे चुकीचे आहे. सीबीएसई बोर्डाने अत्यंत घाईत हा निर्णय घेतला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना असा निर्णय झाला नाही. मग सीबीएसई बोर्डाला घाई का झाली?

- भुजंग थोरे, पालक.

सीबीएसई बोर्डाचा निर्णय चुकीचा आहे. यामधून विद्यार्थ्याचे मूल्यांकन होणार नाही. गुणवान विद्यार्थ्याचे खच्चीकरण करणारा हा निर्णय आहे. असा निर्णय घेण्यापूर्वी बोर्डाने पालक, शिक्षकांशी चर्चा करायला पाहिजे होती. धोका पत्करून अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले होते.

- रमेश कापसे, शिक्षक.