शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासात ४८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:18 IST

मागील दोन आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू वाढले आहेत. दररोज १५ ते २० रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र रविवार ...

मागील दोन आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू वाढले आहेत. दररोज १५ ते २० रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र रविवार आणि सोमवार हे दोन दिवस जिल्ह्यासाठी क्लेशदायक ठरले. शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत ८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. रात्री ८ वाजेपासून ते पहाटेपर्यंत २४ रुग्ण कोरोनाने दगावले. तर सोमवारी दिवसभरात १६ कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मागील दोन दिवसाच्या ४८ तासात ४८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांनीच स्वत:हून कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

१९ एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयातील १२ आणि खासगी रुग्णालयातील ४ अशा १६ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ७ महिला आणि ९ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्याही तेवढ्याच पटीने वाढली आहे. आरोग्य विभागाला सोमवारी १ हजार ९६९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये आरटीपीसीआरच्या १ हजार ३५१ अहवालात ३२६ आणि रॅपिड टेस्टच्या ६१८ अहवालात २४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. दिवसभरात ५७३ नवीन रुग्णांची नोंद झाली.

जिल्ह्यात एकूण २६ हजार ८७ रुग्ण संख्या झाली असून १९ हजार १६२ रुग्ण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७७१ वर पोहोचली. सध्या ५ हजार ५५४ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.

शहरातील जिल्हा रुग्णालयात २१५, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५२, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २६५, अक्षदा मंगल कार्यालयात १४७, रेणुका हॉस्पिटलमध्ये १२२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४ हजार १०० एवढी आहे. उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

७१३ रुग्णांची कोरोनावर मात

सोमवारी ७१३ रुग्णांनी कोराेनावर मात केली आहे. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मागील काही दिवसापासून नवीन नोंदणी होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तेवढी एक समाधानाची बाब आहे.