शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

मन की बात

By admin | Published: March 26, 2015 9:21 PM

आपले हसरे क्षण हीच आपली पूंजी.ती रडक्या आठवणींवर का खर्च करायची?

माणसं आयुष्यात येतात.जातात.
काही माणसं येतात फक्त एक ‘निमित्त’ होऊन;
काही कामापुरती, काही कारणांपुरती!
काम संपलं की, जातात निघून!!
आणि काही माणसं मात्र ऋतूंसारखी.
येतात आणि जगण्याचा मौसमच बदलून टाकतात.
आपण त्यांच्या रंगात रंगतो,
त्या मौसमाचेच होऊन जातो!
काही माणसं मात्र ‘जगणं’ होऊन येतात;
आपलं जगणं त्यांच्या जगण्याचाच भाग होऊन जातं;
ते येतात आणि आयुष्यभर राहतात.
कधी प्रत्यक्षात; तर कधी आठवणी बनून.
पण ती माणसं आयुष्यभर राहण्यासाठीच येतात.
***
निमित्त होऊन आलेली माणसं;
घटकाभरच्या प्रवासात भेटल्यासारखी.
प्रवास मजेत होतं, खूप गप्पा होतात,
मस्त गट्टी जमते, आपण हरखून जातो;
पण प्रवास संपतो,
त्या माणसाचा किंवा आपला थांबा येतो 
आणि ती माणसं निघून जातात,
अनोळखी चेहर्‍यात हरवून जातात.
मग ती माणसं आपल्या आयुष्यात नाहीत
म्हणून रडून, थांबून कसं चालेल?
उलट विचार करुन पहा;
ती व्यक्ती थोडेच दिवस  का आपल्या आयुष्यात?
इमोशनली ढपलेल्या आपल्या जगण्याला
थोडासा आनंदाचा शिपका द्यायला?
कठीण प्रसंगात तुम्हाला मदत करायला?
आपलं कुणीच नाही जवळचं असं वाटत असताना
तुमच्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवायला?
तुम्ही किती स्पेशल आहात, हे तुम्हाला समजावून द्यायला?
**
आपलं प्रत्येकाचं कारण असेलही वेगळं.
पण अशी निमित्तानं आलेली माणसं
आपलं जगणं उजळून टाकताता काही काळासाठी!
आणि मग निघून जातात.
***
त्यांच्या जाण्याचा खूप त्रास होतो.
आपण खूप त्रागाही करतो
स्वत:ला किंवा त्या व्यक्तीला दोष देतो.
आणि जे मिळालेलं असतं ते ही नाकारत बसतो.
**
असं का करायचं?
आपण जे जगतो ते भरपूर जगायचं.
आपल्यासोबत असलेल्या माणसांना 
बांधून घालण्यापेक्षा,
अपेक्षांची ओझी लादण्यापेक्षा जाऊ द्यावं, जायचं असेल तर.
आणि म्हणावं की, चार क्षण का होईना;
किती आनंद मिळाला.
किती सुंदर झाला प्रवास.
***
आपले हसरे क्षण
हीच आपली पूंजी.
ती रडक्या आठवणींवर का खर्च करायची?
( इंटरनेटवर फॉरवर्ड होत असलेल्या ‘रिझन-सिझन’ मेसेजचा मुक्त अनुवाद)