शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

रिस्क घेताय, पण नेमकी कशासाठी?

By admin | Updated: June 5, 2014 18:02 IST

करिअरच्या निर्णायक टप्प्यावर उभी तरुण मुलंच नाही तर त्यांचे पालकही काही गोष्टी ‘मस्ट’ म्हणत उतावीळपणे करत आहेत, त्यांचा हमखास तोल जातोय अशा या काही नव्या निसरड्या जागा.

उतावीळ पालक आणि करिअर कौन्सिलरकडे खेट्या
 
‘आपलं जे झालं ते झालं, आपल्या पोराला काही कमी नको पडायला, काय असतील नसतील तेवढय़ा  टेस्ट करवून घेऊ, जातील दोन-पाच हजार, त्यात काय मोठं? आयुष्याचा प्रश्न आहे.’
असं स्वत:लाच सांगत पालक एखादा कौन्सिलर गाठतात. कौन्सिलरने ठरवावं,
आपल्या मुलाला कोणत्या टेस्ट आवश्यक आहे, हे त्या पालकांना मान्यच नसतं.
ते म्हणतात, तुम्ही इक्यू टेस्ट, आय क्यू टेस्ट, अँप्टिट्यूड टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट, स्पीच थेरपी टेस्ट, जमल्यास स्ट्रेस टेस्टही करूनच टाका.
मग एकामागून एक टेस्टांचा रतीब लागतो.
त्यात मुलाचे जे काय रिझल्ट यायचे ते येतात.
पण त्या रिझल्टवर अनेक पालकांचं समाधानच होत नाही.
ते कौन्सिलरशी जोरदार वाद घालतात, ‘नाही कसं म्हणता, इंजिनिअरिंग तर करायचंच आहे त्याला, त्याचा तसा अँप्टिट्यूडच नाही, त्याच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत म्हणजे काय.तुम्ही पुन्हा एकदा तपासा.
दरम्यान, त्या कौन्सिलरच्या कुवतीविषयी शंका घेऊन दुसरा करिअर कौन्सिलर गाठला जातो.पुन्हा तेच चक्र. तीच तक्रार की, कौन्सिलर करिअरविषयी काही फर्म निर्णयच देत नाही.
कौन्सिलर विनवून सांगतात, की आम्ही निर्णय कसा देणार.?
आम्ही फक्त तुमच्या मुलांचे स्ट्रेंथ्स काय, विकनेसेस काय हे सांगू.
त्याला कल सांगू. त्यावर निर्णय तुम्ही आणि त्यानं मिळून घ्यायचा. पण हे ऐकून मुलांपेक्षा पालकच जास्त फ्रस्ट्रेट होतात.
आणि उपाय म्हणून आणखी एखादा कौन्सिलर गाठतात.
शेवटी त्यांना करायचं तेच करतात, काही पालक मुलांना आपण म्हणू तेच आजही करायला भाग पाडतात. कानाकोपर्‍यातल्या का होईना कॉलेजात अँडमिशन घेऊन देतात. काही पालक, मुलांना म्हणतात तू ठरव तुला काय करायचंय ते. सतरा-अठरा वर्षाच्या अनेक मुलांना आपल्या पालकांना दिलेलं हे स्वातंत्र्य पेलवत नाहीत. ते त्या औदार्याच्या ओझ्याखाली पार दबतात.
आणि झेपणार नाही त्याच अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन मोकळे होतात.
बरीच जणं मनं मारूनच अशी ‘करिअर’ची सुरुवात करतात.
आणि शोधत गेलं तर त्याचं मूळ सापडतं,
पालकांच्या अतीकाळजीत आणि अतीव असुरक्षितेत.
अशा उतावीळ पालकांनी थोडं सबुरीनं घेतलं तर किचकट प्रश्न निर्माण न होताही
कदाचित करिअरची योग्य वाट मुलांना सापडेल.कदाचित.
पण अनेकांच्या बाबतीत आज तसं होत नाहीये, हेच खरं.!