शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याचा कण्ट्रोल कुणाच्या हाती?

By admin | Updated: April 12, 2017 16:13 IST

आपण सगळेच हे सतत करत असतो. लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत. दुसऱ्याला दोष देणं.

- प्रज्ञा शिदोरे

आपण सगळेच हे सतत करत असतो. लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत. दुसऱ्याला दोष देणं. परीक्षेत कमी मार्क पडले तर- काय शाळेत काही नीट शिकवत नाहीत हो. एखादी भाजी करपली तर- अगदी तेव्हाच फोन आला, त्यानं असं झालं. निवडणूक हरलो तर- ईव्हीएम मशीन्समध्ये घोळ असणार! असं काहीही. दुसऱ्याला दोष दिला, स्वत:ला सेफ झोनमध्ये ठेवत आपण वेळ मारून नेतो. मारून नेण्यातच आपल्याला धन्यता वाटते. मोठमोठे मानसशास्त्रज्ञ आणि मॅनेजमेंट गुरूही म्हणतात की, आपली जबाबदारी ढकलून देता ना आपण, तेव्हा आपण आपल्या आयुष्यातून, स्वत:च्या नजरेतून उतरायला लागतो. आपण मग कधीच सत्याला सामोरं जाऊ शकत नाही. असं झालं तर आपण आयुष्यात काही मिळवूही शकत नाही. बेंजामिन हार्डी याने यासंदर्भात सुंदर लेख लिहिला आहे. यात तो म्हणतो की, जगात चार सत्य आहेत. १. निर्णय घेता न येणं ही समस्या तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. २. लोक सतत लटकलेल्या अवस्थेत असतात. त्यांना काय करायचं, आणि ते करण्यामागचा हेतू काय ते कळत नसतं. ३. कोणतीही मोठी गोष्ट घडण्याच्या अगदी आधी तुम्हाला सर्वात जास्त काळोख दिसेल. पुढे काही वाटच नाही असं वाटेल. ४. तुम्ही जेव्हा स्वत:च्या आयुष्याचे सारथी स्वत:च बनाल तेव्हा तुम्हाला तुमच्यातली खरी क्षमता बघायला मिळेल. बाकी अधिक समजून घेण्यासाठी वाचा-  "What happens when you take control of your life" 

 
https://medium.com/the-mission/what-happens-when-you-take-full-responsibility-of-your-life-b72999a03d4e
 
 pradnya.shidore@gmail.com