शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला बोलू द्याल की नाही?

By admin | Updated: March 26, 2015 20:49 IST

पुण्यात दोन दिवस रंगलेल्या युवक साहित्य संमेलनात लिहित्या-वाचत्या तरुण मुला-मुलींनी मांडलेल्या काही प्रश्नांचा हा एक ऑन द स्पॉट रिपोर्ट

कलिम अजिम

पुण्यात दोन दिवस रंगलेल्या युवक साहित्य संमेलनात लिहित्या-वाचत्या तरुण मुला-मुलींनी 
मांडलेल्या काही प्रश्नांचा हा एक ऑन द स्पॉट रिपोर्ट
-------------
‘‘पाळीचे पाच दिवस माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी असतात त्याबद्दल मला बोलायचं आहे, माझ्या मातृत्वाचा आदर  करताना त्यातील  वेदना तुम्ही समजून घेणार आहात का? का नुसतं गौरवीकरण करणार? पण हे सारं बोलणार कुठं? कारण प्रचलित माध्यमं तर रेसिपी, रांगोळी, मेंहदी विशेषांक यांच्यापलीकडे स्त्रीला नाकारतात. मग मी कुठे बोलू? त्यासाठी आम्ही फेसबुक हा मार्ग शोधला; परंतु तिथंही मी काही बोलले की इनबॉक्समध्ये कमरेखाली वार सुरू होतात. हा समाज आणि माध्यमं मला एक मुलगी म्हणून मोकळेपणानं बोलू देणार आहे का?’’
- असे अनेक सवाल अश्‍विनीनं केले त्यावेळी जमलेली तरुण मुलं आणि ज्येष्ठ मंडळीही स्तब्ध झाली. अश्‍विनी बाहेर येताच समवयस्क मुलींनी तिला घेरलं ‘‘आमच्या मनातलं तू बोललीस’’ म्हणत मग अनेकींनी आपापले अनुभव शेअर केले. अश्‍विनीसारखे बरेच तरुण मुलं-मुली आपापल्या मनात खदखदणार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘युवा साहित्य’ संमेलनात जमली होती. 
पुण्यात टेकरेल अकॅडमीच्या वतीनं एस. एम. जोशी सभागृहात गेल्या आठवड्यात दोन दिवसांचे पहिले युवा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. संमेलनाचा उद्देशच होता की, तरुणांना मुक्तपणे बोलता यावं, आपल्या जगण्याविषयी, एक्सप्रेस करण्याविषयी त्यांनीच एकत्र येऊन मुक्त चर्चा करावी. हे सारं मनात ठेवून तरुण-तरुणी जमले होते; मात्र हळूहळू लक्षात आलं की, मुख्य प्रश्न आहे तो आयडेण्टिटी क्रायसिसचा. माझी भाषा, माझं अस्तित्व, मी कोण आहे, समाजात माझं स्थान काय, माझ्या समस्या कोणी ऐकून घेणार का, असे अनेक प्रश्न या तरुणांच्या मनात होते आणि चेहर्‍यावरही!
 संमेलनासाठी अंबाजोगाईतून आलेला धनंजय सांगत होता, ‘मी फेसबुकवर अनेक व्हच्यरुअल मित्र मिळवले. त्या आभासी जगात अनोळखी मित्रांसोबत हिरवळीपासून सेक्सपर्यंत गप्पा मारूनही मन शेवटी अस्वस्थच. माझे रूममेट म्हणवणारे स्पर्धा परीक्षांची भाषा बोलतात. कॅण्टिन आणि कट्टय़ावरचे मित्र स्मार्ट फोन्समध्ये बोटं घालून टूकटूक करतात. मग मी बोलू कोणाशी? ’
कुणालचा प्रश्न त्याहून वेगळा, तो म्हणतो, तरुण मुलांना अस्वस्थ करणार्‍या, छळछळ छळणार्‍या प्रश्नांविषयी थेट आणि स्पष्ट माध्यमंही बोलत नाही. फॅशन आणि ट्रेकिंग असे तरुण विषय, पण बदलत्या तरुण मध्यमवर्गीय जाणिवांविषयी कोण बोलणार?’ 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एमफिल करणारी विजया.   ती म्हणते ‘सोशल मीडियामुळे मी काही बाबतीत सुक्ष्म विचार करू  लागले. धडाधड कोट, विचार माझ्या व्हॉटस अँपच्या मॅसेज बॉक्समध्ये पडतात. पण ते सारं गंभीर नसतं. त्यामुळे मी स्वत:ला वाचनाची सवय लावून घेतली आहे. तिच्यासोबत असलेल्या तिघीजणी गोविंद पानसरेंच्या बहुचर्चित ‘शिवाजी कोण होता’वर चर्चा करत होत्या. 
अशी बरीच चर्चा, वाद आणि अनौपचारिक गप्पांचे अड्डे या संमेलनाच्या निमित्तानं खूप रंगले. व्यासपीठावर तर मान्यवरांनी तरुण जगण्याची, त्यांच्या व्यक्त होण्याची चर्चा केलीच, मात्र त्याचवेळी जमलेली तरुण मुलं आपापलं काही गवसतं आहे का, हे शोधताना दिसली. 
मराठीत अनेक साहित्य संमेलनं भरतात; पण त्या इव्हेण्टमध्ये तरुण, त्यांच्या जाणिवा, प्रश्न, त्यांची घुसमट हे सारं व्यक्त व्हायला कुणी अवसरच देत नाही. म्हणून मग काही तरुणांनी एकत्र येत हे युवा साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय घेतला. संमेलन दोन दिवस उत्तम रंगलं, तरुण मुलं मोकळेपणानं बोलली. तरुण लेखक-वाचक एकत्र आले, यानिमित्तानं निदान काही प्रश्न तरी उघडपणे बोलले गेले! 
- संमेलनातून घरी परतताना ते प्रश्न सोबत आले, डोक्याला त्रास देऊ लागले हे नक्की!
 
--------------
‘‘जसा प्रादेशिक विकासाचा असमतोल असतो तसाच सांस्कृतिक विकासाचाही असमतोल असतो. तो सांस्कृतिक अनुशेष भरून काढणं आणि साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात तरुण मुलांना वाव मिळणं, त्यांना आपल्या लेखन, वाचन प्रक्रियेची चर्चा करता येणं ही या युवक साहित्य संमेलनाची मूळ प्रेरणा होती. त्यातून हे संमेलन भरवलं आणि दोन दिवस तरुण मुला-मुलींनी मोकळेपणानं बोलत, समजून घेत आणि ऐकून घेत ते यशस्वी केलं, याचाच आनंद आहे!’
- सचिन पवार , आयोजक, युवक साहित्य संमेलन