शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अरे, मारशील की रे अशानं.

By admin | Updated: August 1, 2014 11:35 IST

रात्रीचे अकरा वाजले होते. दुपारपासूनच पावसाची रिपरिप चालू होती. निफाडपासून ५-६ कि.मी. वरच रौळस गाव. तसं आडवाटेवरच.

रात्रीचे अकरा वाजले होते. दुपारपासूनच पावसाची रिपरिप चालू होती. निफाडपासून ५-६ कि.मी. वरच रौळस गाव. तसं आडवाटेवरच. कृषी कॉलेजच्या सातव्या सत्रासाठी खेडेगावात राहणं जरुरीचं. मित्र घरी गेलेले. त्यामुळे खोलीवर एकटाच. लाईट गेलेले. बाहेर पाहिलं तर पावसाचा जोर वाढलेला. मेणबत्ती विझवली आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो. १५-२0 मिनटं झाले असतील दरवाजावर टकटक. उठलो. पाहिलं तर बाजूच्या झोपडतीला सखाराम. म्हणाला पोराला ताप आलाय. कण्हतोय. डोळेही उघडत नाही. काय करावं? मी म्हटलं चल. झोपडीत गेलो. पोरगं डोळे थिजून पडलेलं. पोराची आई केविलवाण्या नजरेनं ंपाहत बसलेली.
 मी म्हटलं दुपारीच दवाखान्यात न्यायला काय झालं होतं तर म्हटला दुपारी चांगला होता. आता अचानक ताप वाढला. मी म्हटलो ऊठ. चल सरपंचाकडं. तशाच पावसात छत्री धरून सरपंचाकडं गेलो. सरपंच कामानिमित्त मुंबईत गेलेले. वहिनी एकट्याच. असाच अर्धा तास गेला. ताप तर वाढत असलेला. घाई नाही केली तर काही अघटित व्हायचं. मी म्हटलं थांब, मी डॉक्टर घेऊन येतो.
खोलीवर गेलो. रात्रीचे बारा वाजलेले. खेडेगावात कुठली रिक्षा? पावसात गाडी काढली. रेनकोट घातला. आभाळ फाटावं तसा पाऊस. खूप शिव्या दिल्या पावसाला. म्हटलं लेका, लोकांना जीवनदान देणारा तू स्वत: मात्र निर्जीवच आहेच की, कधी पडावं. कधी पडू नये याच्याशी तुला काय घेणंदेणं. पण आता थांब. कशाचं काय, तो पडतच होता. 
गाडीचा वेग जमेल तितका वाढवत पिटाळली. सर्वत्र अंधार. वेशीबाहेर येताना खड्डा दिसला नाही. गाडी आणि मी दोन्ही जबर आपटलो. सुन्न कळ शरीरातून फिरली. गरम पाणी डोळ्य़ातून पाझरलं. उठलो गाडी उचलली. चालता येत नव्हतं तरीही किक मारून पाहिल्या. गाडी बंद. ५0-६0 किक मारल्या तेव्हा गाडी चालू झाली. या झटापटीत रेनकोट फाटला. सगळं शरीर पावसाच्या अधीन झालं. पावसाचा जोर वाढतच होता.
निघालो. वाटेत कादवा नदी आडवी. फरशी वरून पाणी वेगानं वाहत होतं. अशात गाडी नेऊ नये ही ताकीद माहीत असूनसुद्धा गाडी टाकली. पूल कसाबसा पार केला. निफाड गाठलं. डॉक्टरची पाटी दिसली. उठवलं. परिस्थिती सांगितली. खूप गयावया केल्या. डॉक्टर तयार झाले. डॉक्टर रेनकोट घालून. झाकूनझुकून तयार. नदीपाशी आलो तर नदीचं भीषण रूप पाहून डॉक्टर घाबरले. म्हणाले नाही, मी नाही येत. उतरव इथेच. थांब. मी लक्ष दिलं नाही. तसा त्यांचा कलकलाट जास्त वाढला. गाडी थांबवली. त्यांच्याकडं पाहिलं. तासाभरापासून पावसात भिजलो होतो. पायात कुठंतरी फ्रॅक्चर असावी अशी कळ अजूनही शरीरात जाणवत असलेली. गाडीवर थंड वार्‍याच्या झोतानं अंगातली असलेली नसलेली ऊब निघून गेलेली. डोक्यानंकाम करण्याचं केव्हाच बंद केलेलं. फक्त श्‍वास चालू असल्याचा भास. अशात डॉक्टरांची कलकल. थोड्यावेळ शांत राहिलो. आणि कसं काय कुणास ठाऊक डॉक्टरांच्या कानात एक ठेवून दिली. म्हटलं, ***** जर आला नाहीस ना तर याच पाण्यात ढकलून देईन. काहीच समजत नव्हतं. फक्त डोळ्य़ासमोर सखाचा हातपाय वाकडा केलेला पोरगा दिसता होता. डॉक्टर नाईलाजानं बसले. नदी पार केली.
झोपडीपाशी आलो. सखा खिन्न हसला. काळजात धस्स झालं. म्हटलं काय झालं? पण पोराचा हात हालत होता.             
डॉक्टरांनी सलाईन लावली. इंजेक्शन दिलं. अर्धा तासात ताप कमी झाला. पोरगा शुद्धीवर आला. डॉक्टर बसल्या बसल्या पेंगत होते. तिथेच खाटेवर त्यांची सोय लावून दिली. रूमवर आलो. दरवाजा उघडला. आणि धाडकन खाली कोसळलो. जाग आली तेव्हा दुसर्‍या दिवशी दुपारचे दोन वाजले होते. सखाच्या पोराला बरं वाटत असल्याचं कानावर येत होतं. पाहिलं तर मलाच सलाईन सुरू असल्याचं जाणवलं. पण तेवढंच, परत शुद्ध हरपली माझी.!
- पराग विश्‍वासराव बिर्‍हाडे
 ढाकेवाडी, जळगाव