शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भिजून विरलेलं नातं..

By admin | Updated: August 1, 2014 11:40 IST

नेमका दिवस आठवत नाही. पण सकाळपासून रिमझिम सुरू होती. आदल्या दिवशी आमचं कडाक्याचं भांडण झालं होतं. प्रचंड उदास आणि अस्वस्थ होतो.

नेमका दिवस आठवत नाही. पण सकाळपासून रिमझिम सुरू होती. आदल्या दिवशी आमचं कडाक्याचं भांडण झालं होतं. प्रचंड उदास आणि अस्वस्थ होतो. तिला फोन केला तर तिचीही तशीच गत होती. तिला म्हणलो भेटायचंय तुला ती पण लगेच हो म्हणाली. नेहमीच्या  आईस्क्रीम पार्लरवर गेलो. ती आली. पण पार्लर बंद होतं. आमच्यामधील शांतता भयाण. तिला म्हणलो, ‘चल   लाँग ड्राइव्हला जाऊ.’ ती पण तयार झाली. तिच्या स्कूटीवर मी पुढे आणि ती मागे. ती माझ्यामागे बरंच अंतर ठेवून बसली होती. ते आमच्या नात्यामध्ये पडत चाललेलं अंतर होतं. फिरताना हळूहळू बोलायला लागलो आणि पावसात भांडण विरघळून गेलं. भर पावसात रस्त्यावर आमचीच गाडी.  पेट्रोल संपेपर्यंत खूप फिरलो. 
पावसाला त्यावेळी खूप धन्यवाद दिले. आधीच आवडणारा पाऊस त्यावेळी जिगरी दोस्त वाटू लागला. आमच्या नात्याला नवसंजीवनी मिळाली होती.
पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यानंतर आमचं ब्रेकअप झालंच. त्यालाही आता दोन वर्षं झाली आहेत. ती कुठं आहे मला माहीत नाही. तिच्या आठवणी मी खोलवर पुरून टाकल्या आहेत. पण हा पाऊस आला की त्या आठवणी उफाळून येतात. कधीकाळी जिगरी असलेला पाऊस जानी दुश्मन वाटायला लागतो. पाऊस आला की मनात उदासी भरते. पावसाबरोबर डोळेही अखंड बरसू लागतात. तोंड लपवून मी खूप रडतो.
आता पावसात भिजणं टाळतो. पाऊस आला की दारं-खिडक्या लावून अस्वस्थपणे एकांतात बसून रहातो. पाऊस पडलाच नाही तर बरं असं वाटतं.  निदान माझ्या परिसरात तरी त्यानं पडूच नये, अशी भाबडी आशा करतो. 
पण पावसात आजही एकच प्रश्न छळतो, या पावसासोबतच तिलाही माझी आठवण येत असेल का? 
- किरणकुमार, पुणे