शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात दरवर्षी ६० टक्के इंजिनिअर बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 13:19 IST

इंजिनिअरिंगला स्कोप आहे हा भ्रम आता विसरा. कंपन्या म्हणतात, इंजिनिअर नोकरीस लायकच नाहीत, म्हणून जेमतेम ४० टक्के तरुण इंजिनिअर्सना मिळते नोकरी!

‘कोणी नोकरी देता का नोकरी... चार वर्षं, लाखो रु पये खर्चून, पालकांच्या आग्रहाखातर, मामा-काकांची उदाहरणं बघून, कुठल्याशा नातेवाइकांचे सल्ले घेऊन, मित्रांचं ऐकून, क्वचित प्रसंगी स्वखुशीने आणि बहुतेकदा दुसरं काहीच माहीत नसल्यानं इंजिनिअर झालेल्या तरुणाला कुणी नोकरी देता का नोकरी?- असं आजचं चित्र आहे.इंजिनिअर झालेला हा तरुण आईवडिलांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली, शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाखाली दबून गेलाय. मनासारखं काम, पगार हे सर्व मिळण्याची अपेक्षा सोडून कसलीही का असेना पण त्याला नोकरी हवी आहे.हे वर्णन अतिरंजित वाटेल, पण ते आजचं वास्तव आहे.‘आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ म्हणजेच ‘एआयसीटीई’ (अकउळए) या भारतातील तांत्रिक शिक्षणविषयक सर्व बाबींचे नियोजन, नियमन आणि नियंत्रण करणाºया संस्थेमार्फत प्रसिद्ध झालेली ही गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहा.हे आकडेच वास्तव सांगतात. आणि ते वास्तव फार वाईट आहे.

२०१२ ते २०१६ या चार वर्षांत देशातील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण उत्तीर्ण झालेल्या आणि नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी टक्केवारी जेमतेम ४० टक्के इतकी आहे. देशभराचा विचार केला असता सरत्या शैक्षणिक वर्षात २९,९८,२३८ एवढ्या प्रचंड संख्येने इंजिनिअरिंगच्या जागा उपलब्ध होत्या. यापैकी १५,०६,९७७ इतक्याच जागा भरल्या गेल्या. म्हणजेच पदविका, पदवी आणि पदव्युत्तर मिळून जवळपास निम्म्या जागा या रिकाम्याच राहिल्या. गेल्या काही वर्षांत रिकाम्या राहणाºया या जागा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. परंतु इंजिनिअर झालेल्यांपैकीही जेमतेम ४० टक्के विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळाली हे चित्र जास्त भयावह आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती ही अधिक गंभीर आहे, कारण गेल्या वर्षी उपलब्ध ३,४४,८९८ जागांपैकी केवळ १,६१,९३५ इतक्याच म्हणजे निम्म्याहून कमी इंजिनिअरिंग कॉलेजच्या जागा भरल्या गेल्या. गेल्या चार वर्षांत दर १०० उत्तीर्णांपैकी केवळ सरासरी २५ जणांनाच नोकरी मिळाली आहे. या सगळ्यात ती नोकरी कोणत्या स्वरूपाची आहे? तिचा घेतलेल्या शिक्षणाशी संबंध कितपत आहे? दर्जा काय? त्यानुसार मिळणारा पगार किती? - हे सारे महत्त्वाचे प्रश्न लक्षात घेतलेले नाहीत. त्यांचा विचार केला असता एकूण विषयाची भीषणता अधिक तीव्र होऊ शकते.आपण इंजिनिअरिंग करत असू किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार असू तर ही माहिती आपल्या हाताशी असलेली बरी!

(या आकडेवारीसह देशातील तसेच राज्यातील उत्तीर्ण आणि नोकरीप्राप्त विद्यार्थ्यांची आकडेवारी तसेच देशातील अभियांत्रिकी शिक्षणाविषयीची इतर सर्व माहिती www.aicte-india.org या वेबसाइटवर पाहता येईल.)