शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

द. आफ्रिकेचा विजय, प्रेक्षकांनी मैदानात फेकल्या बाटल्या

By admin | Updated: October 5, 2015 23:02 IST

टी-ट्वेन्टी सामन्यात द.आफ्रिकेने सहा गडी राखून भारतावर विजय मिऴवला. यामुळे आता भारताच्या दुस-या पराभवामुळे द.आफ्रिकेने तीन सामन्याच्या टी-ट्वेन्टी मालिकेवर आपले नाव निश्चित केले आहे.

ऑनलाइन लोकमत

कटक , दि. ५ - टी-ट्वेन्टी सामन्यात द.आफ्रिकेने सहा गडी राखून भारतावर विजय मिऴवला. यामुळे आता भारताच्या दुस-या पराभवामुळे द.आफ्रिकेने तीन सामन्याच्या टी-ट्वेन्टी मालिकेवर आपले नाव निश्चित केले आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय टीमच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा समोर दिसणा-या पराभवामुळे संतप्त भारतीय प्रेक्षकांनी मैदानावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. यामुळे पंचांनी दोनवेळा खेळ अर्धावरच थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळानंतर सामना सुरु करण्यात आला. मात्र तोपर्यंत नाराज प्रेक्षकांनी घरी जाणे पसंत केले.

जेपी ड्युमिनी आणि एबी डिव्हिलर्सच्या जोरावर भारतीय टीमने दिलेले ९३ धावांचे आव्हान  द. आफ्रिकेने मोडून काढले. जेपी ड्युमिनीने सर्वाधिक नाबाद ३० धावा केल्या, तर एबी डिव्हिलर्सने १९ धावा केल्या. हाशिम आमला ०२, डू प्लेसिस १६ धावा केल्या. 

त्यापुर्वी, भारतीय फलदांजानी खराब फटकेबाजी करत अवघ्या ९२ धावा केल्या. यामध्ये  रोहित शर्मा(२२) आणि महत्वपुर्ण खेळी करणारा विराट (०१) धावबाद झाले. तर रैना(२२), धवन(११), धोनी(०५), रायडू(०), पटेल(०९), हरभजन(०) यांनीही निराश केले. अश्विन ने ११ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजाने तो सार्थ ठरवला, दक्षिण आफ्रिकातर्फे अ‍ॅल्बी मोर्केल ०३, इम्रान ताहिर ०२, ख्रिस मॉरिस ०२ आणि कॅगिसो रबादा ०१ बळी मिळवले.