शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या खेळपट्टीत दोष नाही

By admin | Updated: December 10, 2015 01:01 IST

भारत-द. आफ्रिका यांच्यात नुकत्याच आटोपलेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी नागपुरात विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित स्टेडियमवर आयोजिण्यात आली.

मुंबई : भारत-द. आफ्रिका यांच्यात नुकत्याच आटोपलेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी नागपुरात विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित स्टेडियमवर आयोजिण्यात आली. या सामन्यातील खेळपट्टी खराब असल्याचा अहवाल मॅच रेफ्रीने आयसीसीला पाठविला असून बीसीसीआयला उत्तर देण्यास सांगण्यात आले. बीसीसीआयला मात्र या खेळपट्टीत कुठलीही खोट आढळलेली नाही.खेळपट्टीच्या गुणवत्तेवर जे आरोप लावण्यात आले त्याचा सामना करण्यास आम्ही सज्ज असल्याचे बीसीसीआयने आयसीसीला कळविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मीडियात आलेल्या वृत्तानुसार आयसीसी मॅच रेफ्री जेफ क्रो यांनी दिलेल्या अहवालाशी बीसीसीआय सहमत नाही. खेळपट्टीवरून निर्माण झालेल्या वादळानंतर आयसीसीला उत्तर देण्याची बोर्डाने तयारीदेखील केली आहे. २९ नोव्हेंबरपासून येथे झालेला हा सामना भारताने तीन दिवसांत संपविला होता. या खेळपट्टीवर तिन्ही दिवस फलंदाजांना अक्षरश: नाचावे लागल्याने जगभरातून टीका झाली होती. आयसीसीने १ डिसेंबर रोजी जामठाच्या खेळपट्टीचा अहवाल पाठविण्यासाठी नोटीस बजावली होती. नागपूर खेळपट्टीची गुणवत्ता उच्च दर्जाची असून आपल्याला त्यात कुठलाही दोष अथवा उणीव आढळत नाही. आयसीसीला जे उत्तर अपेक्षित आहे ते देण्याची आमची तयारी असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. बोर्डाला १५ डिसेंबरपर्यंत आयसीसीकडे अहवाल पाठवायचा आहे. भारताने द. आफ्रिकेला मालिकेत ३-० ने पराभूत केले. मोहाली आणि नागपूर कसोटी भारताने तीन दिवसांत जिंकली हे विशेष.(वृत्तसंस्था)नागपूर खेळपट्टीत कुठलाही दोष नव्हता. या खेळपट्टीवर अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने चेंडू वळतो हा आरोपही खोटा आहे. चेंडू वळण्याची प्रक्रिया ही गोलंदाजांच्या क्षमतेवर अवलंबून असते. गोलंदाज विकेटवर चेंडू किती टर्न करू शकतो, हा ज्याच्या त्याच्या क्षमतेचा भाग आहे.- बीसीसीआयहा सामना भारतीय संघाने तीन दिवसांत १२४ धावांनी जिंकला होता. पहिल्या डावात भारताच्या ७८.२ षटकांत सर्वबाद २१५ धावा झाल्या होत्या. मुरली विजयने ४० धावा केल्या होत्या. द. आफ्रिका संघाकडून मॉर्केलने ३ व हर्मेरने ४ विकेट घेतल्या होत्या.द. आफ्रिकेचा डाव ३३.१ षटकांत १२७ मिनिटांत ७९ धावांत संपुष्टात आला होता. त्यांचे ८ खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. जेपी ड्युमिनीने ३५ धावा केल्या होत्या. भारताकडून आर. आश्विनने ५, तर रवींद्र जडेजाने ४ विकेट घेतल्या होत्या.भारताचा दुसरा ४६.३ षटकांत १७३ धावांत संपुष्टात आला होता. यावेळी शिखर धवने ३९ धावा केल्या होत्या. मॉर्केलने ३, तर ताहिरने ५ विकेट घेतल्या होत्या.तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा डाव ८९.५ षटकांत १८५ धावांत संपुष्टात आला होता. भारताकडून आर. आश्विनने ७, तर अमित मिश्राने ३ विकेट घेतल्या होत्या.