शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
3
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
4
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
5
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
6
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
7
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
8
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
9
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
10
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
11
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
12
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
14
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
15
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
17
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
18
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
19
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
20
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
Daily Top 2Weekly Top 5

मोहालीतही टीम इंडियाची ‘कसोटी’

By admin | Updated: October 28, 2015 22:23 IST

एकदिवसीय मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. मात्र, ही मालिका खूपच खडतर असेल.

सचिन कोरडे, गोवा
एकदिवसीय मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. मात्र, ही मालिका खूपच खडतर असेल. दक्षिण आफ्रिकन संघ ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता भारतापुढे मोठे आव्हान असेल. त्यातच मोहालीतील खेळपट्टी भारतीय गोलंदाजांसाठी ‘कसोटी’ घेणारीच ठरेल, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी व्यक्त केले. शालेय खेळाडूंसाठी आयोजित भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या एका उपक्रमासाठी चेतन शर्मा गोव्यात आले आहेत. या वेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
येत्या ५ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेस सुरुवात होईल. पहिला कसोटी सामना मोहाली येथे होत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने सरावास सुरुवात केली आहे. मोहाली येथील खेळपट्टी भारतीय जलदगती गोलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरेल, असे चेतन शर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘भारतीय गोलंदाजांचा वेग आणि आफ्रिकन गोलंदाजांचा वेग याची तुलना केली तर भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान असेल. येथील खेळपट्टी ही उसळती आणि फिरकीपटूंसाठीही पोषक असते. सध्या दक्षिण आफ्रिका संघात डेल स्टेन, रबाडा, मॉर्नी मॉर्केल, इम्रान ताहिर हे गोलंदाज खूप प्रभावी ठरले आहेत. तुलनेत, भारतीय गोलंदाजांची धार बोथट दिसत आहे. भुवनेश्वर कुमारसारख्या गोलंदाजालाही अजून लय मिळवता आली नाही. प्रमुख गोलंदाज अपयशी ठरत आहेत. त्यामुळे कसोटी मालिकाही भारतासाठी इतकी सोपी नसेल.’’
धोनीवर शिंतोडे कशासाठी?
एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ अपयशी ठरला. या पराभवास धोनी जबाबदार आहे, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, पराभवास एकटा धोनी कारणीभूत नाही. त्यामुळे त्याच्यावर शिंतोडे उडवणे योग्य नाही. संपूर्ण मालिकेत भारताची कामगिरी खराब झाली, असे म्हणणे योग्य नाही; पण दिग्गज अपयशी ठरले हे मात्र खरे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात आपण अपयशी ठरलो आहोत. धवन, रोहित, विराट हे फलंदाज फॉर्मशी झगडताना दिसताहेत. गोलंदाजी हा तर खूप चिंतेचा विषय ठरत आहे. (वृत्तसंस्था)
आफ्रिकन संघ गोव्यात
भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफिकेचा संघ गोव्यात सुटी घालविण्यासाठी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये निवासासाठी आला होता. आफ्रिकन खेळाडूंनी येथे विजयाचा आनंदही साजरा केला. मात्र, माध्यमांना याबाबत पुसटशी कल्पनाही लागू दिली नाही. दोन दिवसांसाठी हा संघ गोव्यात होता. आफ्रिकन संघातील खेळाडू भारतात आल्यानंतर गोव्यात नक्की येतात. आयपीएलदरम्यानही ते गोव्याला भेट देतात. सध्या पर्यटन हंगाम असून आफ्रिकन संघाने येथील किनारे आणि पर्यटनस्थळांना भेट दिली.