शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

जगज्जेत्याला झुंजविलं, आता जिंकण्यासाठीच खेळणार- सरदारसिंग

By admin | Updated: June 22, 2016 20:33 IST

जगज्जेता असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला झुंजविल्याने खेळाडूंचा आत्मविश्वसा प्रचंड वाढला आहे

शिवाजी गोरे

पुणे, दि. 22 - जगज्जेता असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला झुंजविल्याने खेळाडूंचा आत्मविश्वसा प्रचंड वाढला आहे. आता प्रत्येक सामना हा जिंकण्यासाठीच खेळणार आहे. आॅलिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी संपूर्ण संघ आतुर असल्याचा विश्वास भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग याने व्यक्त केला. बंगळुरू येथील साई सेंटर येथे सध्या भारतीय हॉकी संघाचा सराव सुरू आहे. यामध्ये सहभागी असलेल्या सरदार सिंग याने लोकमतशी संवाद साधला. सरदार म्हणाला,  मार्गदर्शक रोलंट ओल्टमन्स प्रत्येक खेळाडूची जातीने तयारी करून घेत आहेत. युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांच्या मनातील भीती घालविणे. उणिवा व चुकांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करणे याचा त्यामध्ये समावेश आहे. दीड महिन्यावर आॅलिम्पिक स्पर्धा आली आहे. चॅम्पियन्स चषक स्पर्धेत आपल्या संघाने बलाढ्य आॅस्ट्रेलिया संघाला अंतिम सामन्यात गोलशून्य बरोबरीत रोखले. पेनल्टी शूटआऊटमध्ये आपल्याला रौप्यपदक मिळाले, हा एक इतिहासच आहे. भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम फेरीत कधीच प्रवेश केला नव्हता. आॅलिम्पिक स्पर्धेत आपल्या गटात असलेल्या इतर संघांची सध्या कामगिरी आणि आपली तयारी याबाबत काय सांगाल?जगज्जेत्या आॅस्ट्रेलियाला आपल्या संघाने अंतिम लढती शेवटपर्यंत झुंजवले. यावरून तुम्ही अंदाज करू शकता, की आपल्या संघाची तयारी कशी सुरू असेल. प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. ओल्टमन्स यांचे संघाच्या कामगिरी सुधारण्याबाबतचे प्रयोग उपयोगात येत आहेत. त्यांनी संघातील खेळाडूंच्या शैलीत चांगलाच बदल घडवून आणला आहे. कॅनडासारखा संघ आपल्या गटात असला तरी आम्ही त्या संघाला कमी लेखणार नाही. प्रत्येक सामना जिंकण्याच्या दृष्टीने खेळावा लागणार आहे. प्रत्येक संघाविरुद्ध खेळताना आम्हाला एक वेगळे नियोजन करावे लागणार आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने कोणतेही दडपण न घेता मनमोकळेपणाने खेळावे, असे त्यांचे म्हणणे असते. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध, दुसरा जर्मनी, तिसरा अर्जेंटिना, चौथा नेदरलॅँड आणि पाचवा कॅनडा त्यामुळे आम्ही जे काही गुण संपादन करायचे आहेत, ते पहिल्या चार लढतींमध्ये करावे लगणार आहेत.

संघाच्या प्रशिक्षणात कशावर भर दिला जात आहे?तंदुरुस्ती (फिटनेस), तंत्र (टेक्निक), चपळता, लाँग व शॉर्ट पासिंग यावर ओल्टमन्स यांचा जास्त भर असतो. आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी एकमेकांमध्ये समन्वय कसा साधायचा, यावर विशेष लक्ष दिले जात आहे. चॅम्पियन्स चषकातील चुका आम्हाला सुधाराव्या लागतील. आपण पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत झालो. व्हिडिओ पंचांनी काहीही निर्णय देऊ द्यात, आम्हाला नक्कीच सुधारणा करावी लागणार आहे. हरमनप्रीत, रघुनाथ, उथप्पा, सुनील, सुरेंद्र, मनप्रीत यांच्या खेळात खूपच सुधारणा झाली आहे. चॅम्पियन्स चषकच्या अंतिम लढतीत श्रीजेशचे गोलरक्षण थक्क करणारे होते. पण तरीही प्रत्येक सामन्याच्या वेळी कोणाचा कसा खेळ होतो, हे महत्त्वाचे असते. ओल्टमन्स खेळाडूंच्या तंदुरुस्तीकडे जास्त लक्ष देतात. कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये, याकडे त्यांचे लक्ष असते. एकूण सराव आणि सध्या संघाची कामगिरी पाहता मी एवढेच सांगू शकतो, की आम्ही या वेळी आमच्या चाहत्यांना नाराज करणार नाही. 

आपल्या ब गटात जर्मनी, अर्जेंटिना, आयर्लंड, नेदरलँड आणि कॅनडा हे संघ आहेत. या वर्षीपासून प्रत्येक गटातील चार संघ क्वार्टर फायनलसाठी पात्र होतील. त्यामुळे आम्हाला आमच्या गटात पहिल्या चार क्रमांकांमध्ये येणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण विरुद्ध संघाच्या उणिवा शोधून रणनीती आखत असतो. त्याचप्रमाणे समोरच्या संघाचे खेळाडू व मार्गदर्शक नियोजन करीत असतात. त्यामुळे आपले खेळाडू आपल्या मार्गदर्शकाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक सामन्यात खेळ त्या वेळी मैदानावर होईल तो महत्त्वाचा.युवा खेळाडूंना संधीसाठीच मला विश्रांतीपुढील काळात मला सातत्याने सामने खेळायचे आहेत, त्याचबरोबर संघातील युवा खेळाडूंना बलाढ्य संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळावा, यामुळेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मला विश्रांती दिली गेली, असे सरदार सिंगने सांगितले.