शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिकेची खराब सुरवात, २ बाद २८ धावा

By admin | Updated: November 5, 2015 17:28 IST

आर. अश्विन आणि जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेचे फलंदाज आले आहेत. सुरवातीलाच त्यांना दोन धक्के मिळाले आहेत. अश्विनने स्टिअॅनला तर जडेजाने ड्यु प्लेसिसला तंबूत पाठवले.

ऑनलाइन लोकमत
चंदिगढ, दि. ५ - आर. अश्विन आणि जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेचे फलंदाज आले आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी २८ धावांमध्ये अफ्रिकेचे दोन गडी तंबूत परतले होते. अश्विनने स्टिअॅनला तर जडेजाने ड्यु प्लेसिसला तंबूत पाठवले. १६ षटकानंतर द. आफ्रिकाने २ गडी गमावत २८ धावा केल्या आहेत. कर्णधार आमला(९) आणि डीन एल्गार (१३) मैदानावर खेळत आहेत.
त्यापुर्वी डीन एल्गारच्या फिरकीने पहिल्या कसोटीत सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या २०१ धावांवर संपुष्टात आला. मुरली विजयच्या ७५ व रविंद्र जडेजाच्या ३८ धावांची खेळी वगळता अन्य एकही फलंदाज आफ्रिकेच्या मा-यासमोर तग धरु शकला नाही. 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताचा शिखर धवन हा सलामीचा फलंदाज भोपळाही न फोडता बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर थोडा स्थिरावलेला पुजाराही ३१ धावांवर बाद झाला आणि विराट कोहलीही अवघी १ धाव काढून तंबूत परतला. त्यानंतर मुरली विजयने अजिंक्य रहाणेच्या साथीने सावध फलंदाजी करत भारताला १०० धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र त्यानंतर रहाणे (१५) व त्यापाठोपाठी वृद्धीमान सहा (०) पटापट बाद झाले. मुरली विजयने ७५ धावांची संयमी खेळी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हार्मरच्या गोलंदाजीवर विजय पायचीत झाला व भारताच्या आशा मावळल्या. यानंतर रविंद्र जडेजा आणि आर अश्विनने (२०) एकाकी झूंज देत भारताला १७५ चा पल्ला गाठून दिला.  उमेश यादव ५ तर वरुण अॅरोन शून्यावर बाद झाला. आफ्रिकेतर्फे एल्गारने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर इम्रान ताहिर व फिलँडरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हार्मर व रबादाने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताच्या सहा फलंदाजांना दोन आकडी धावाही गाठता आल्या नाहीत. 
टी-२० आणि वन डे मालिकेतील पराभवानंतर कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाची चव चाखवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारल्याने भारताची अवस्था बिकट झाली आहे.