शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

विस्कटलेली घडी बसविण्यासाठी मांडवली

By admin | Updated: December 20, 2014 22:34 IST

हेवेदावे आणि पदांच्या लालसेपोटी सुरू झालेल्या वादाने महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धेवर निलंबनाची नामुष्की ओढावली आहे.

स्वदेश घाणेकर - मालवणहेवेदावे आणि पदांच्या लालसेपोटी सुरू झालेल्या वादाने महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धेवर निलंबनाची नामुष्की ओढावली आहे. भारतीय जलतरण संघटनेच्या (एसएफआय) पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी ही कारवाई करायला लावल्याचे सांगण्यात येते. त्याच पदाधिकाऱ्यांच्या मदतीने राज्य संघटनेची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाची पदे देऊन ‘मांडवली’ करण्याच्या हालचालींना सुरुवात झाल्याचे सूत्रांकडून कळते. राज्य संघटनेच्या निलंबनानंतर होत असलेल्या सिंधुदुर्ग सागरी जलतरण शर्यतीत सहभाग घेऊ नका, असा फतवा काढण्यात आला होता. मात्र, स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादामुळे हेच फतवा काढणारे हातमिळवणीसाठी पुढे सरसावले असल्याचे समजते आहे. गेली दहा वर्षे राज्य संघटनेने जमाखर्च न दाखविल्याचे कारण पुढे करत एसएफआयने निलंबनाची कारवाई केली आणि पुण्याचे अभय दाढे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या अस्थायी समितीची नेमणूक केली. या समितीने सिंधुदुर्ग जलतरण शर्यतीत सहभाग न घेण्याचा फतवा इतर जिल्हा संघटनांना दिला आणि तो न ऐकल्यास खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले. तसे पत्रही जिल्हा संघटनांना पाठविल्याचे या समितीमधील सदस्य प्रभाकर घरत यांनी सांगितले. ते म्हणाले, खेळाडूंचे नुकसान होऊ नये हे माझे मत असून तडजोडीसाठी तयारी आहे. मात्र, राज्य संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आमच्या तडजोडीच्या प्रस्तावाला त्यांनी दाद दिली नाही. मात्र, सिंधुदुर्गातील या शर्यतीला १८ संलग्न संघटनेच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवून हा फतवा मान्य नसल्याचे दाखवून दिले.त्याचमुळे या समितीला आपले अस्तित्व नष्ट होण्याची भीती वाटू लागली आणि त्यांच्याकडून राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेचे सत्र सुरू झाले. माजी सचिव किशोर वैद्य यांनीही याला दुजोरा दिला असून येत्या दोन-तीन दिवसांत वाद मिटेल, अशी आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, संघटनेवर निलंबनाची कारवाई होण्यापूर्वी या शर्यतीला राज्य संघटनेने मान्यता दिलेली होती. त्यावेळी मी सचिव पदावर कार्यरत होतो. त्यामुळे त्यांच्या या फतव्याला काहीच अर्थ राहत नाही. हा वाद मिटावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या दोन-तीन दिवसांत त्यात यश मिळेल. हा वाद लवकर मिटेल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष सुधाकर शानबाग यांनी व्यक्त केला आहे. येथील चिवला समुद्रात रविवारी पाचव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत २४ जिल्ह्यांतील जवळपास ११८४ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. त्यात ८५० मुले, २९० मुली आणि ४४ अपंग खेळाडूंचा सहभाग आहे. रविवारी पहाटे ६ वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. ५ कि.मी., ३ कि.मी., २ कि.मी., १ कि.मी. व ५०० मीटर या पाच गटात पार पडणार आहे. दरम्यान, सराव करताना नागपूर येथील १४ वर्षीय रिद्धी परमार या स्पर्धकाला समुद्री मासा चावल्याची घटना आज, शनिवारी सकाळी घडली.