शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून ‘रन’संग्राम

By admin | Updated: February 24, 2016 03:43 IST

रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबई व सौराष्ट्र संघांत बुधवारपासून (दि. २४) विजेतेपदाची लढत होत आहे. क्रिकेटप्रेमींना या ‘रन’संग्रामाचा

पुणे : रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबई व सौराष्ट्र संघांत बुधवारपासून (दि. २४) विजेतेपदाची लढत होत आहे. क्रिकेटप्रेमींना या ‘रन’संग्रामाचा आस्वाद विनामूल्य घेता येणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. मुंबईचा संघ ४५ व्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. सौराष्ट्राचा संघ दुसऱ्यांचा अंतिम फेरीत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. हे दोन संघ २०१२-१३ मध्ये अंतिम फेरीत समोरासमोर आले होते. त्यात मुंबईने सौराष्ट्रला एक डाव व १२५ धावांनी पराभूत करीत ४० वा किताब नावावर केला होता. मुंबईने उपांत्य फेरीत पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मुंबईने मध्य प्रदेश संघाला मात दिली होती. सौराष्ट्र संघाने आसाम संघावर तिसऱ्या दिवशी १० गडी राखून विजय मिळविला. त्यामुळे सौराष्ट्र संघ चांगली लढत देईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. रणजीच्या ८२ वर्षांच्या इतिहासात मुंबईने ४० वेळा किताब नावावर केला आहे. चार वेळा ते उपविजेते राहिले आहेत. मुंबई १९९१ नंतर खेळलेल्या दहा अंतिम सामन्यांत एकदाही हरलेली नाही. मुंबईची मदार ही फलंदाजांवर असेल. श्रेयस अय्यरने या मोसमात दहा सामन्यांत ३ शतके व ७ अर्धशतकांच्या सहाय्याने १ हजार २०४ धावांची खेळी केली आहे. अखिल हेरवाडकर (८७९), सूर्यकुमार यादव (७४०), सिद्धेश लाड (६०३) व कर्णधार आदित्य तारे (५५०) अशी भक्कम फलंदाजांची फळी मुंबईकडे आहे. सौराष्ट्रचा जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकट बहरात असून, त्याच्या नावावर २० बळी आहेत. त्याने उपांत्यपूर्व फेरीत ७० धावांत व २५ धावांत प्रत्येकी ५ बळी घेतले होते. उपांत्य सामन्यांत ७७ धावांत ६ व ४५ धावांत ५ बळी टिपले आहेत. याशिवाय चेतेश्वर पुजाराने उपांत्य फेरीत शतकी खेळी केली होती. शेल्डन जॅक्सन (५२५), सागर जोगियानी (४७४) देखील चांगले बहरात आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)मुंबई : आदित्य तारे (कर्णधार-यष्टीरक्षक), सुर्यकुमार यादव, अभिषेक नायर, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, निखिल पाटील, शार्दुल ठाकुर, सिद्धेश लाड, धवल कुलकर्णी, विशाल दाभोलकर, इक्बाल अब्दुल्ला, बद्रे आलम, भाविन ठक्कर, सुफियान शेख, बलविंदर सिंग संधु.सौराष्ट्र : जयदेव शहा (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, अवि बारोत, चेतेश्वर पुजारा, चिराग जानी, जयदेव उनादकट, प्रेरक मनजाद, कमलेश मकवाना, धर्मेंद्रसिंह जडेजा, वंदित जीवराजानी, अर्पित वासवदा, दिपक पुनिया, हार्दिक राठोड, मोहसिन दोडिया, सागर जोगियानी (यष्टीरक्षक).श्रेयस अय्यर बाराशे धावांच्या घरात मुंबईचा श्रेयस अय्यर (१ हजार २०४) हा एकाच मोसमात १२०० हून अधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी केदार जाधव (१२२३), वसीम जाफर (१२६०), विजय भारद्वाज (१२८०) व व्हीव्हीएस लक्ष्मण (१४१५) या खेळाडूंचा समावेश आहे.