शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

..तर वर्ल्डकप फायनलचा निकाल सुपर ओव्हरद्वारे

By admin | Updated: January 29, 2015 13:47 IST

क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) गुरुवारी घेतला.

ऑनलाइन लोकमत 
दुबई, दि. २९ -  क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) गुरुवारी घेतला. तसेच सध्या सुरु असलेल्या क्रिकेट मालिकांमध्ये षटकांची गती धीमी राखल्याबद्दल विश्वचषकातील सामन्यांमध्ये निलंबित करता येणार नाही अशी दिलासादायक घोषणाही आयसीसीने केली आहे. 
गुरुवारी दुबईतील आयसीसीच्या मुख्यालयात बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०११ च्या विश्वचषकात आयसीसीने अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेतला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत आयसीसीने २०१५ च्या विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर न खेळविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे दोन्ही संघांना विभागून विश्वविजेतेपद दिले जाणार होते. मात्र आज झालेल्या बैठकीत आयसीसीने आधीचा निर्णय रद्द करुन आवश्यकता असल्यास सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास क्रिकेट प्रेमींना सुपर ओव्हरचा थरार अनुभवता येणार आहे. 
सध्या सुरु असलेल्या क्रिकेट मालिकांमध्ये षटकांची गती कमी राखल्यास कर्णधाराचे निलंबन होऊ शकते. मात्र या कारवाईची अंमलबजावणी विश्वचषकात न करता विश्वचषकानंतर होणा-या स्पर्धांमध्ये केली जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. १४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत विश्वचषक स्पर्धा होणार असून या स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी झाले आहेत. 
.................
२०१६ मधील टी -२० विश्वचषक भारतात 
२०१६ मधील टी - २० विश्वचषक भारतात रंगणार असून गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर आयसीसीने ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तर २०१९ मध्ये होणारे विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार आहे.