शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

संबंध संपुष्टात येणार!

By admin | Updated: October 19, 2014 01:25 IST

नाराज असलेल्या बीसीसीआयचा पुढील पाच वर्षार्पयत विंडीजविरुद्ध द्विपक्षीय क्रिकेट थांबविण्याचा व मोठय़ा रकमेची नुकसानभरपाई मागण्याबाबत विचार आहे.

भारत - वेस्ट इंडीज : द्विपक्षीय क्रिकेट थांबवण्याचा विचार
मुंबई : वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारताचा दौरा अर्धवट सोडून माघार घेतल्यामुळे नाराज असलेल्या बीसीसीआयचा पुढील पाच वर्षार्पयत विंडीजविरुद्ध द्विपक्षीय क्रिकेट थांबविण्याचा व मोठय़ा रकमेची नुकसानभरपाई मागण्याबाबत विचार आहे. विंडीज बोर्डावरील कारवाईचा व नुकसानभरपाईच्या रकमेबाबत 21 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे होणा:या बीसीसीआय कार्यसमितीच्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे.
मनधरणी केल्यानंतर विंडीजचे खेळाडू शुक्रवारी धर्मशाला येथे चौथ्या सामन्यासाठी मैदानात दाखल झाले. त्यांनी दौ:यातील उर्वरित सामन्यातून माघार घेणार असल्याचे बीसीसीआयला कळविले. आता बीसीसीआय विंडीज बोर्डाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहे. बोर्डाच्या काही सदस्यांच्या मते, विंडीज क्रिकेट बोर्डाने दौरा अध्र्यावर सोडून रद्द केल्यामुळे बीसीसीआयपुढे अडचण निर्माण केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई होणो आवश्यक आहे. भविष्यात विंडीजविरुद्ध कुठल्याही मालिकेचे आयोजन टाळावे व आयपीएलमध्ये विंडीजच्या खेळाडूंना सहभागी होण्यापासून रोखावे. अनेक सदस्यांच्या मते, यात खेळाडूंचा दोष नसून त्यांना शिक्षा करण्यात येऊ नये. बीसीसीआयचे सहसचिव अनुराग ठाकूर म्हणाले, बोर्डाने कॅरेबियन संघासोबतचे सर्व नाते संपवावे. बीसीसीआयने त्यांची मनधरणी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण वेतनाच्या मुद्दय़ावर खेळाडू खेळण्यास तयार नव्हते. मानधनाच्या मुद्दय़ावर खेळाडूंबाबत वाईट वाटते, पण विरोध करण्याचा हा प्रकार योग्य नव्हता, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
 
कार्यसमितीच्या सदस्यांच्या चर्चेनंतर विंडीजविरुद्ध भविष्यातील दौरे (एफटीपी) कायम ठेवायचा अथवा नाही, याबाबत निर्णय होईल. तसेच आम्ही नुकसानभरपाईची मागणी करणार असून, याची तक्रार आयसीसीकडे करणार आहोत. आम्ही कार्यसमितीची तातडीची बैठक बोलावली असून, त्यात या प्रकरणासह श्रीलंका संघाच्या दौ:याबाबत चर्चा होणार आहे.
- संजय पटेल, सचिव बीसीसीआय