शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

रहाणेने तारले, चौथी कसोटी अनिर्णीत

By admin | Updated: January 10, 2015 12:31 IST

अजिंक्य रहाणेने टिच्चून केलेल्या ३८ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी अनिर्णीत राखण्यात भारताला यश मिळाले आहे.

ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. १० - अजिंक्य रहाणेने टिच्चून केलेल्या ३८ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी अनिर्णीत राखण्यात भारताला यश मिळाले आहे. रहाणेने भुवनेश्वर कुमारसह केलेल्या ७० चेंडूत ३५ धावांच्या भागीदारीमुळे भारताने पाचव्या दिवसाखेर ८९.५ षटकांत ७ गडी गमावत २५२ धावा केल्या आणि  अखेर ही कसोटी अनिर्णीत राहिली. 
ऑस्ट्रेलियाच्या ३४९ धावांचा पाठलाग करताना मुरली विजय (८०) आणि विराट कोहली (४६) यांनी चांगली खेळी करत भारताला विजयाच्या आशा दाखवल्या होत्या, पण इतर फलंदाजांनी टिकाव न धरल्याने भारत ही कसोटी गमवायच्या बेतात होता. मात्र अजिंक्य रहाणेने सावध खेळ करत ८८ चेंडूत ३८ धावा केल्या आणि ही कसोटी अनिर्णीत राखली. भारत २-० अशी मालिका हरला असला तरी शेवटच्या दोन कसोटी अनिर्णीत राखल्यामुळे भारताची काही प्रमाणात लाज राखली गेली आहे. 
चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात शानदार शतकी खेळी करणारा के.एल.राहुल (१६) व रोहित शर्मा (३९ ) हे भरवशाचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर मुरली विजयने कोहलीसह भारताच्या डावाला आकार दिला. मात्र ८० धावांवर खेळताना विजय हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर रैना (०) आणि सहा (०) हे दोघे भोपळाही न फोडता बाद झाले. विराट कोहली मैदानावर असल्याने भारताच्या जिंकण्याच्या आशा कायम होत्या. मात्र अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वीच तो ४६ धावांवर बाद झाला आणि भारताची अवस्था बिकट झाली. अखेर रहाणेने टिकाव धरल्याने भारताने पाचव्या व अंतिम दिवसाचा डाव संपताना ७ गडी गमावत २५२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क, लियॉन आणि हेझलवूडने प्रत्येकी २ तर वॉटसनने १ बळी टिपला.