शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक हॉकी मालिका सुरू करा : पाक कोच

By admin | Updated: June 10, 2015 01:24 IST

भारत-पाकदरम्यान क्रिकेट संबंध पूर्ववत करण्यासाठी उभय देशांतील क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न सुरू असतानाच आता दोन्ही देशांत हॉकी मालिका पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी पुढे आली आहे.

नवी दिल्ली : भारत-पाकदरम्यान क्रिकेट संबंध पूर्ववत करण्यासाठी उभय देशांतील क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न सुरू असतानाच आता दोन्ही देशांत हॉकी मालिका पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी पुढे आली आहे. पाक हॉकी संघाचे मुख्य कोच शहनाझ शेख यांनी आशियाई हॉकी वाचविण्यासाठी ही मालिका सुरू होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. बेल्जियममधील एंटवर्प येथे २० जूनपासून सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या सेमिफायनलच्या तयारीत व्यस्त असलेले शेख इस्लामाबाद येथून वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, ‘‘भारत-पाक हॉकी मालिका पूर्ववत न झाल्यास आशियाई हॉकी संपून जाईल. आमचे खेळाडू शैलीदार खेळण्याऐवजी क्लिनिकल हॉकीवर भर देतील.’’ भारत आणि पाक संघ विश्व हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत अ गटात आहेत. याच गटात आॅस्ट्रेलिया, फ्रान्स आणि पोलंडचा समावेश आहे. भारत-पाक सामना २६ जून रोजी खेळला जाईल. या सामन्यात पाक संघ भारतावर मात करेल, असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला. भुवनेश्वर येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात पाकने भारताला ४-३ ने पराभूत केले होते. पाकसाठी ६८ सामन्यांत ४५ गोल नोंदविणारे दोन वेळेचे आॅलिम्पियन शेख पुढे म्हणाले, ‘‘आधुनिक हॉकीतील आघाडीच्या दहा संघांच्या खेळात फारसा फरक नाही. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेत भारताला धूळ चारली. या वेळीदेखील आमची तयारी भक्कम आहे; पण सामन्याच्या दिवशी होणाऱ्या कामगिरीवर विजयाचे समीकरण विसंबून असते.’’आॅस्ट्रेलियात पाकने चार देशांच्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर दहा दिवसांचा कोरियाचा दौरा केला. ५ जूनपासून संघाचे इस्लामाबाद येथे तयारी शिबिर सुरू झाले. वर्षभरापूर्वी पाक संघाचे कोच बनलेले शेख पुढे म्हणाले, ‘‘अलीकडे आम्ही फार चांगली हॉकी खेळलो. पूर्वी प्रतिस्पर्धी हॉकी खेळणे कठीण झाले होते. सध्या पेनल्टी कॉर्नर ही संघाच्या जमेची बाजू ठरली आहे. आधुनिक हॉकीत पेनल्टी कॉर्नरचे विशेष महत्त्व असून, आमच्या संघात चार पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञ आहेत. आम्ही शूटआऊटवरदेखील कठोर मेहनत घेत असल्यामुळे कनव्हर्शन रेट चांगला आहे.’’ पाकचा संघ ११ जून रोजी निवडला जाईल. १५ जून रोजी हा संघ स्पर्धास्थळी रवाना होणार आहे. (वृत्तसंस्था)