शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वन-डेतही आक्रमक खेळी कायम राहील

By admin | Updated: October 15, 2016 01:32 IST

आक्रमकतेच्या बळावरच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत शानदार विजय साकार होऊ शकले. आगामी वन-डे मालिकेतही आक्रमक खेळणे कायम राहणार

धर्मशाला : आक्रमकतेच्या बळावरच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत शानदार विजय साकार होऊ शकले. आगामी वन-डे मालिकेतही आक्रमक खेळणे कायम राहणार असल्याचे संकेत मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे याने दिले आहेत.अलीकडेच आटोपलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० ने क्लीन स्वीप केले. आक्रमक धोरणामुळेच आम्ही यशस्वी ठरलो, असे रहाणेला वाटते. एचपीसीए स्टेडियमवर पत्रकारांशी बोलताना रहाणे म्हणाला, ‘माझ्या मते शिस्तबद्ध खेळ महत्त्वाचा आहे. कसोटीत आम्ही आक्रमक धोरणाचा अवलंब केला. आता पुन्हा आक्रमक धोरण स्वीकारण्याची वेळ आली आहे. प्रतिस्पर्धी संघाची बलस्थाने आणि कच्चे दुवे शोधण्याच्या भानगडीत न पडता आपली क्षमता ओळखण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला लय मिळविणे हे पाच सामन्यांच्या मालिकेत संघापुढील पहिले ध्येय असेल.’मालिकेतील पहिला सामना उद्या, रविवारी धर्मशाला येथे खेळला जाईल. फलंदाज या नात्याने कमी वेळेत कसोटी ते वन-डे अशा प्रकारात स्वत:ला फिट बसविणे किती कठीण असते, असा सवाल करताच अजिंक्य म्हणाला, ‘माझ्या मते हे फलंदाजांच्या मानसिकतेवर विसंबून असते. व्यावसायिक खेळाडू या नात्याने आम्हाला कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी सज्ज असावेच लागते. मानसिकरीत्या सकारात्मक राहून परिस्थितीशी ताळमेळ साधण्याचे आव्हान असते. आम्ही अनुभवी खेळाडू असल्याने कसोटी ते वन-डे या प्रवासात कसा खेळ करावा, हे सांगण्याची गरज नाही.’भारताला या मोसमात व्यस्त क्रिकेट खेळायचे असल्याने सध्याच्या वन-डे मालिकेतून रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली. त्यांच्या जागी जयंत यादव, अक्षर पटेल, मनदीपसिंग, धवल कुलकर्णी, मनीष पांडे यांना स्थान देण्यात आले. नव्या चेहऱ्यांना संधी देणे हा चांगला प्रयोग असल्याचे सांगून रहाणे म्हणाला, नव्या सहकाऱ्यांच्या खेळाबद्दल मला देखील उत्सुकता आहे. यापैकी काहींनी रणजी करंडकात चमकदार कामगिरी केली. आता राष्ट्रीय संघात खेळून या सहकाऱ्यांनी स्वत:चा आत्मविश्वास उंचवावा, अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)