शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा शानदार विजय

By admin | Updated: December 14, 2015 02:46 IST

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर बलाढ्य मुंबईने विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील दुसरा विजय मिळवताना

सिकंदराबाद : फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर बलाढ्य मुंबईने विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील दुसरा विजय मिळवताना आसामला ९६ धावांनी लोळवले. तीन सामन्यांतून मुंबईचा हा दुसरा विजय असून स्पर्धेच्या ‘अ’ गटात मुंबईकर ८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. तर आसामचा हा सलग तिसरा पराभव असून ते गटात तळाला आहेत.रेल्वे मैदानावर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून मुंबईकरांनी प्रथम फलंदाजी घेतली खरी, मात्र त्यांचा हा निर्णय चांगलाच महागात पडला. आसामने अनपेक्षित मारा करताना मुंबईकरांचा डाव ४९.५ षटकांत केवळ १९८ धावांत संपुष्टात आणला. रणजी स्पर्धेत मुंबईचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरलेल्या श्रेयश अय्यर सर्वाधिक ४९ धावा फटकावल्या. तर सुर्यकुमार यादवने ४२ धावांचे योगदान दिले. यावेळी आसाम धक्कादायक विजय मिळवणार असे दिसत होते. मात्र मुंबईने लौकिकाप्रमाणे ‘खडूस’ खेळ करताना आसामला विजयापासून दूरच ठेवले.आंतरराष्ट्रीय गोलंदाज धवल कुलकर्णी याने आपल्या अनुभवाच्या जोरावर आसामला धक्के देताना १० षटकांत केवळ १९ धावा देऊन ४ फलंदाज बाद केले. तर सागर त्रिवेदी आणि अभिषेक नायर यांनी प्रत्येकी ३ बळी घेताना धवलला चांगली साथ दिली. या त्रयींच्या भेदकतेपुढे आसामचे फलंदाज कोलमडले आणि त्यांचा डाव ३५ षटकांत केवळ १०२ धावांत संपुष्टात आला. मधल्या फळीतील अमित वर्मा (४८ चेंडूत ३३ धावा) आणि जमालुद्दिन सय्यद मोहम्मद (४८ चेंडूत २५ धावा) यांचा अपवाद वगळता आसामच्या इतर फलंदाजांना फारकाळ तग धरता आला नाही.तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा डाव अनपेक्षितपणे रोखण्यात आसामला यश आले. आसामने केलेल्या टिच्चून माऱ्यापुढे मुंबईकर अडखळल्याने मुंबईचा अर्धा संघ ९३ धावांत बाद झाला. जय बिस्त स्वस्तात परतल्यानंतर अखिल हेरवाडकरला चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलण्यात अपयश आले. तो २३ धावा काढून बाद झाला. यानंतर कर्णधार आदित्य तरे (७) देखील अपयशी ठरला. तर पुढच्याच षटकात सिध्देश लाड धावबाद झाल्याने मुंबईची ४ बाद ८४ अशी घसरगुंडी उडाली. एका बाजूने अय्यर भक्कमपणे उभा होता. त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. अय्यर पाचव्या फलंदाजांच्या रुपात बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले. यानंतर सुर्यकुमार यादव तसेच अंतिम फळीतील धवल कुलकर्णी (नाबाद २१) व सागर त्रिवेदी (२४) यांनी उपयुक्त खेळी करताना संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. आसामच्या प्रितम दास, अमित वर्मा आणि जमालुद्दिन मोहम्मद यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईला रोखले. धावफलक : मुंबई : अखिल हेरवाडकर धावबाद (अरुण कार्तिक) २३, जय बिस्त झे. रहमान गो. एके दास ७, श्रेयश अय्यर झे. अमित गो. पल्लवकुमार ४९, आदित्य तरे झे. व गो. प्रितम ७, सिद्धेश लाड धावबाद (रॉय) ०, अभिषेक नायर यष्टीचीत रहमान गो. अमित ३, सूर्यकुमार यादव त्रि. गो. सय्यद ४२, इक्बाल अब्दुल्ला झे. रहमान गो. प्रितम १४, धवल कुलकर्णी नाबाद २१, शार्दूल ठाकूर झे. अरुण गो. सय्यद ३, सागर त्रिवेदी झे. अरुण गो. अमित २४. अवांतर - ५. एकूण : ४९.५ षटकांत सर्वबाद १९८ धावा.गोलंदाजी : क्रिष्णा दास ७-०-२८-०; अरुप दास ९-०-४५-१; प्रितम दास १०-०-४६-२; पल्लवकुमार दास १०-२-३०-१; अमित वर्मा ७.५-०-२३-२; जमालुद्दीन सय्यद मोहम्मद ६-०-२४-२.