शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

जिंकण्यासाठी दुखवावे लागतेच : कोहली

By admin | Updated: June 13, 2017 04:48 IST

अपयशातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक कर्णधारांची वेगवेगळी पद्धत असते. विराट कोहलीचे सोपे सूत्र आहे. प्रामाणिक राहा आणि सहकारी खेळाडूंच्या हृदयावर आघात होईल

लंडन : अपयशातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक कर्णधारांची वेगवेगळी पद्धत असते. विराट कोहलीचे सोपे सूत्र आहे. प्रामाणिक राहा आणि सहकारी खेळाडूंच्या हृदयावर आघात होईल, अशा काही बाबी बोला. श्रीलंकेविरुद्धचा पराभव कोहलीसाठी मोठा धक्का होता, त्यानंतर संघाला आत्ममंथन करण्याची गरज भासली. कोहली म्हणाला, ‘तुम्ही स्वत: प्रामाणिक असायला हवे; सहकारी खेळाडूंच्या हृदयावर आघात होईल, असे काहीतरी वक्तव्य करायला हवे. माझ्या मते तेच योग्य आहे. चूक कुठे झाली, हे खेळाडूंना सांगायला हवे. त्यापासून बोध घेत मैदानात उतरावे लागेल. त्यासाठी लाखो व्यक्तींमधून या पातळीवर खेळण्यासाठी आपली निवड झाली आहे.’ गत चॅम्पियन भारताने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळाच्या प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवले. आता उपांत्य फेरीत भारताची गाठ बांगलादेशसोबत पडणार आहे. भारतीय कर्णधार म्हणाला, ‘अपयशानंतर दमदार पुनरागमन करण्याची कला असणे आवश्यक आहे. तुम्ही वारंवार चुकीची पुनरावृत्ती करू शकत नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला जाते.’ कर्णधारपद सांभाळताना प्रामाणिकपणे संघाचे आकलन करणे आवश्यक असते, असेही कोहलीने सांगितले. कोहली म्हणाला, ‘खेळाडूला त्याची चूक लक्षात आणून देताना त्याला वारंवार त्याबाबत बोलणे चुकीचे आहे. कारण मी या सर्वांसोबत बराच खेळलो आहे. त्यांच्यासोबत कसे बोलायचे आणि कुठली चर्चा करायची, याचे ज्ञान असायला हवे.’ कोहली पुढे म्हणाला, ‘या पातळीवर खेळण्यासाठी आणि चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित आहे. छोट्या-छोट्या बाबींवर समर्थन मिळणे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)