शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

कसोटी क्रिकेट संपविण्याचे कारस्थान

By admin | Published: November 29, 2015 1:29 AM

व्हीसीएच्या जामठा स्टेडियमच्या खेळपट्टीचा अनेक दिग्गजांनी खरपूस समाचार घेतला. माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी या खेळपट्टीवर सडकून टीका केलीच, शिवाय

नवी दिल्ली : व्हीसीएच्या जामठा स्टेडियमच्या खेळपट्टीचा अनेक दिग्गजांनी खरपूस समाचार घेतला. माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी या खेळपट्टीवर सडकून टीका केलीच, शिवाय अशा खेळपट्टीची मागणी करणारा कर्णधार विराट कोहली आणि विकेट तयार करणाऱ्यांना इतिहास माफ करणार नाही, या शब्दांत धारेवर धरले आहे.भारत-द. आफ्रिका यांच्यात शुक्रवारी संपलेल्या तिसऱ्या कसोटीतील खेळपट्टी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. ही खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल होती. स्थानिक संघाला लाभ देण्याच्या हेतूने ती तयार करण्यात आल्याचे वक्तव्य करीत बेदी म्हणाले, ‘चांगल्या आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची आणि विशेष प्रकारच्या मातीची गरज असते; पण येथे काहीही करण्याची गरज भासली नाही. नागपुरात केवळ विकेट बनवायची म्हणून बनविण्यात आली.’ द. आफ्रिका संघाच्या पडझडीनंतर क्रिकेटविश्वात या खेळपट्टीवर अनेक सवाल उपस्थित झाले होते. अशा प्रकारच्या खेळपट्ट्या कसोटी क्रिकेटला संपविण्यास पूरक असल्याची टीका करीत ६९ वर्षांचे बेदी पुढे म्हणाले, ‘भारताने द. आफ्रिकेला पराभूत केले, पण त्यात काय अर्थ आहे. आयपीएलने कसोटी क्रिकेटला संपविले. अशा प्रकारच्या खेळपट्ट्या कसोटीला पूर्णपणे संपवीत आहेत. नागपूर कसोटी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती आणि आयसीसीच्या क्रिकेटविषयक समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे सामन्याचे समालोचक होते. स्वत: भारताचा दुसरा डाव १७३ धावांत आटोपला याचा अर्थ काय!’सामन्यात १२ गडी बाद करणारा रविचंद्रन अश्विन याच्याबद्दल बेदी म्हणाले, ‘अश्विन परिपक्वगोलंदाज असल्याने त्याला बळी घेण्यासाठी अशाप्रकारच्या खेळपट्ट्यांची गरज नाही. अशा खेळपट्ट्या बनवून तुम्ही अश्विनची प्रतिभा संपवीत आहात. रवींद्र जडेजाला अशा खेळपट्ट्यांची गरज असेल; पण अश्विनला मुळीच नाही.’ कारकिर्दीत ६७ कसोटी आणि दहा वन-डे सामन्यांत डावखुरे फिरकीपटू बेदी यांनी दोन्ही प्रकारांत २७३ गडी बाद केले आहेत. (वृत्तसंस्था)मी लहान तोंडी मोठा घास घेणार नाही. डग्लस जॉर्डिन याने १९३२-३३ मध्ये बॉडी लाईन गोलंदाजी आणली. क्रिकेटविश्वाला त्याला उत्तर देणे भाग पडले. कोहलीला देखील असेच उत्तर द्यावे लागेल. आम्ही कसोटी क्रिकेट संपवीत आहोत. पडद्यामागे ज्यांची यात भूमिका आहे, त्यात कोहलीदेखील तितकाच जबाबदार ठरतो. - बिशनसिंग बेदी, माजी कर्णधार