शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

भारताची विजय पंचमी

By admin | Updated: March 11, 2015 00:47 IST

आॅस्ट्रेलियातील चार सामने जिंकून सुसाट सुटलेला धोनी सेनेचा वारु न्यूझीलंडमध्येही आपला झेंडा फटकावित आहे.

हॅमिल्टन : आॅस्ट्रेलियातील चार सामने जिंकून सुसाट सुटलेला धोनी सेनेचा वारु न्यूझीलंडमध्येही आपला झेंडा फटकावित आहे. भारताने मंगळवारी आयर्लंडचा ७९ चेंडू व ८ गडी राखून पराभव केला आणि आयसीसी क्रिकेट विश्वकप स्पर्धेत ‘ब’ गटात अव्वल स्थान पक्के केले. भारताचा या स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय ठरला. फार्मात आलेल्या गोलंदाजीने आयर्लंडला २५९ च्या माफक धावांवर रोखून विजयाचा पाया रचला होता, त्यावर फलंदाजांनी कळस चढविण्याचे काम केले. सलामीवीर शिखर धवनने ८५ चेंडूत शतक झळकावित विजयात मोलाचा वाटा उचलला.विश्वचषक स्पर्धेतील भारताचा हा सलग नववा विजय आहे. आयर्लंड संघाचा पाच सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे, पण बाद फेरी गाठण्याच्या शर्यतीत हा संघ अद्याप कायम आहे. आयर्लंडचा कर्णधार विल्यम पोर्टरफिल्ड याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ‘सेफ गेम’ खेळला. न्यूझीलंडच्या छोट्या मैदानावर भारताला प्रथम फलंदाजी दिली तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागू नये हा त्यामागचा विचार असावा. पण भारतीय गोलंदाजांनी आॅस्ट्रेलियातील कामगिरीचा आलेख न्यूझीलंडमध्येही उंचावताना आयर्लंडचा डाव ४९ षटकांत २५९ धावांत गुंडाळला. गोलंदाजांनी विजय आवाक्यात आणून ठेवल्यावर पुढील सोपस्कार फलंदाजांनी आरामात पूर्ण केले. विजयासाठी आवश्यक धावा ३६.५ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. स्टर्लिंग आणि पोर्टरफिल्ड या जोडीने आठव्या षटकात धावसंख्येचे अर्धशतक गाठले होते. या स्पर्धेत भारतीय गोलंदाजांना प्रथमच सुरुवातीच्या स्पेलमध्ये बळी मिळविण्यात अपयश आले, त्यामुळे चाहत्यांच्या मनात थोडी शंकेची पाल चुकचुकली. पण धोनीने खेळपट्टीचा स्वभाव ओळखला आणि नवव्या षटकापासून दोन्ही बाजूंनी फिरकीचा मारा सुरु केला. धोनीची ही मात्रा लगेच कामी आली. जलदगती गोलंदाजी आरामात खेळणारे न्यूझीलंडचे फलंदाज फिरकीपुढे चाचपडू लागले. रविचंद्रन अश्विनने आपल्या दुसऱ्याच षटकांत भारताला पहिले यश मिळवून दिले. फिरकीचा दबाव झुगारण्यासाठी अश्विनला पुढे येवून षटकार ठोकण्याचा प्रयत्न स्टर्लिंगच्या अंगलट आला आणि त्याने अजिंक्य रहाणेकडे झेल दिला. पोर्टरफिल्डला मग साथ देण्यास नील ओब्रायन आला. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असताना मोहीत शर्माने पोर्टरफिल्डचे काम तमाम केले. या विकेटसने भारताचा जीव भांड्यात पडला असे वाटत असताना नील ओब्रायन व अँडी बालबिर्नी (२४) यांनी पाचव्या विकेटसाठी ७.४ षटकांत ६१ धावांची भागीदारी केली, पण ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर आयर्लंडचा डाव गडगडला. भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत ६.३ षटकांत ३२ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. आयर्लंडतर्फे कर्णधार विलियम पोर्टरफिल्ड (६७) व नील ओब्रायन (७५) यांनी अर्धशतके झळकावली. रविचंद्रन अश्विनने ३८ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले तर मोहम्मद शमीने ४१ धावांत ३ फलंदाजांना माघारी परतवण्याची कामगिरी केली. उमेश यादव, मोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. अशा खेळपट्टीवर फलंदाजी कशी करावी याचे प्रात्यक्षिक भारतीय फलंदाजांनी आज आयरिश फलंदाजांना दिले. प्रत्युत्तरात खेळताना धवनने ८५ चेंडूंना सामोरे जात १०० धावांची खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत (६४) सलामीला १७४ धावांची भागीदारी करीत विजयाचा पाय रचला. त्यानंतर विराट कोहली (नाबाद ४४) आणि अजिंक्य रहाणे (नाबाद ३३) यांनी संघाला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. भारताने ३६.५ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. भारताला यानंतर १४ मार्च रोजी आॅकलंड येथे साखळीतील अखेरच्या सामन्यांत झिम्बाब्वेविरुद्ध खेळावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)