शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे दमदार पुनरागमन

By admin | Updated: June 13, 2017 04:41 IST

श्रीलंकेविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतर भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेसारख्या दिग्गज संघाच्या आव्हानाला सामोरे

- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...श्रीलंकेविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतर भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेसारख्या दिग्गज संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. गेल्या लढतीतील पराभवातून सावरताना विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत दमदार पुनरागमन केले. प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये दडपणाखाली दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी कामगिरी ढेपाळते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. भारतीय संघ या लढतीत नव्या जोमाने खेळला. मैदानावर खेळाडूंची देहबोली, शिस्त, सुरुवातीला भुवनेश्वर व बुमराह यांचा अचूक मारा, चपळ क्षेत्ररक्षण हे बघितल्यानंतर भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या निर्धाराने मैदानात उतरला असल्याचे दिसून आले. विराटने आपल्या गोलंदाजांना चांगले हाताळले आणि त्यांनी कर्णधाराचा विश्वासही सार्थ ठरविला. नव्या चेंडूने मारा करणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्यामुळे बॅकफूटवर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा डाव गडगडला. दोन देशांदरम्यानच्या मालिकांमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला अद्याप स्पर्धेचे कोडे मात्र सोडविता आलेले नाही. त्यांच्या रणनीतीनुसार धावा फटकावल्या गेल्या नाही, तर त्यांच्यावर दडपण येते. भारतीय गोलंदाजांनी टाकलेल्या निर्धाव षटके व चेंडूंमुळे त्यांचे समीकरण गडबडले. महत्त्वाच्या लढतीचे दडपण अनुभवी फलंदाजांवरही दिसून येते, याचे आश्चर्य वाटते. एबी डिव्हिलियर्स व डेव्हिड मिलर हे दिग्गज फलंदाज धावबाद झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने प्रतिस्पर्धी संघाला वचरढ ठरण्याची संधी बहाल केली. महत्त्वाच्या लढतीत या अनुभवी फलंदाजांनी संघाच्या स्पर्धेतील भविष्यावर प्रश्नचिन्ह लावले. भारतीय संघाने दमदार व सकारात्मक खेळ केला. या खेळपट्टीवर वेगाने धावा पटकावणे शक्य नसून येथे संयमी फलंदाजी करणे आवश्यक असल्याचे भारताच्या लवकर लक्षात आले.गोलंदाज व क्षेत्ररक्षकांच्या चमकदार कामगिरीनंतर शिखर धवनने या जागतिक स्पर्धेत फलंदाजीतील सातत्य कायम राखले. सुरुवातीला विराटला लय गवसली नाही, पण त्याने धीरोदात्त खेळी केली. (गेमप्लॉन)जम बसल्यानंतर त्याने फटकेबाजी केली. भारतीय क्रिकेटसाठी हा शानदार दिवस ठरला.दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या लढतीतील पराभव विसरून भारतीय संघ नव्या जोमाने सज्ज झाला आहे.एजबेस्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या उपांत्य लढतीत बांगलादेशला नवा उत्साह संचारलेल्या भारतीय संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (गेमप्लॉन)