शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

भारत-बांगलादेश सामना फिक्स

By admin | Updated: March 21, 2015 01:13 IST

विश्वचषकात गुरुवारी भारत-बांगलादेश ही उपांत्य लढत पूर्वनियोजित (फिक्स) होती खळबळजनक वक्तव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी केले आहे.

आयसीसी अध्यक्षांचा खळबळजनक आरोप : भारताला जिंकविण्यासाठी कटकारस्थानसिडनी : विश्वचषकात गुरुवारी भारत-बांगलादेश ही उपांत्य लढत पूर्वनियोजित (फिक्स) होती आणि भारताला जिंकता यावे असेच निर्णय पंचांनी दिल्याचे खळबळजनक वक्तव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी केले आहे.मेलबोर्न येथे झालेला हा सामना भारताने १०९ धावांनी जिंकला होता. या सामन्यात १३७ धावा ठोकणारा रोहित शर्मा ४० व्या षटकांत रुबेल हुसेनच्या चेंडूवर डिप मिडविकेटवर झेलबाद झाला. मात्र चेंडू कंबरेच्या वर असल्याने मैदानी पंच इयान ग्लाऊड यांनी तो ‘नो बॉल’ दिला होता. या निर्णयाविरोधात बांगलादेशात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.कमाल म्हणाले, ‘मी जे पाहिले त्यानुसार पंचांची कामगिरी खराब होती. अम्पायरिंग कुठल्याही दर्जाचे नव्हतेच. मनात पूर्वग्रह राखून दोन्ही पंच सामना खेळवत आहेत की काय असे दिसत होते. पंच चुका करू शकतात. त्यांची कृती हेतुपुरस्सर होती काय हे आयसीसी तपासणारच आहे. सर्व काही रेकॉर्डबद्ध आहे. आयसीसीला याचा तपास करावा लागेल, हे मी आयसीसी अध्यक्ष म्हणून नव्हे तर संघाचा चाहता म्हणून बोलत आहे.’ कमाल यांचे फिक्सिंगबाबतचे वक्तव्य हे आधारहीन तसेच पंचांच्या खराब कामगिरीवरील आरोप दुर्दैवी असल्याचे सांगून भारत-बांगला देश सामना फिक्स होता, हा आरोप आयसीसीने फेटाळला आहे. सीईओ डेव्ह रिचर्डसन म्हणाले,‘मुस्तफा कमाल यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांचे हे विधान खासगी असेल. आयसीसी अध्यक्ष या नात्याने पंचांच्या कामगिरीवर टीका करताना त्यांनी संयम बाळगला पाहिजे. पंचांच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्याचे कारण नाही. ‘नो’ बॉलच्या निर्णयाचा कुणाला तरी लाभ होणारच पण खेळभावना सांगते की, पंचांच्या निर्णयाचा सन्मान व्हावा. भारताला जिंकविण्यासाठी मैदानी आणि तिसऱ्या पांचांनी एकतर्फी निर्णय घेतले असे म्हणणे सपशेल चुकीचे आणि दुर्दैवी आहे. आयसीसी कमाल यांचे विधान फेटाळून लावते.’कमाल म्हणाले, ‘मी जे पाहिले त्यानुसार पंचांची कामगिरी खराब होती. अम्पायरिंग कुठल्याही दर्जाचे नव्हतेच. मनात पूर्वग्रह राखून दोन्ही पंच सामना खेळवत आहेत की काय असे दिसत होते.- कमाल मुस्तफा,अध्यक्ष, आयसीसीपंचांविरोधात बीसीबी तक्रार करणारदरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने देखील मैदानी पंचांच्या विरोधात आयसीसीकडे पाठविण्यात येणाऱ्या अहवालात तक्रार करण्यात येईल, असे म्हटले आहे. बीसीबी अध्यक्ष नजमूल हसन म्हणाले, ‘आयसीसी अध्यक्ष कमाल यांच्यासोबत माझी चर्चा झाली. मैदानी पंचाविरुद्ध आयसीसीकडे जी काही दाद मागता येईल ती आम्ही मागणार आहोत.’