शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

होबार्ट सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजी सुधारेल?

By admin | Updated: January 22, 2015 00:17 IST

पहिल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजी क्रमात केलेले प्रयोग आणि नवे संयोजन तपासूनही पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने भारतीय संघाची फलंदाजी सुधारण्याची चिन्हे नाहीत.

सिडनी : पहिल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजी क्रमात केलेले प्रयोग आणि नवे संयोजन तपासूनही पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने भारतीय संघाची फलंदाजी सुधारण्याची चिन्हे नाहीत. यावर तोडगा म्हणून विराट कोहली याला तिरंगी मालिकेत चौथ्या स्थानावर पाठवून फलंदाजीतील उणिवा दूर सारण्याचे ‘टीम इंडिया’चे प्रयत्न राहतील. महेंद्रसिंग धोनीच्या संघाला इंग्लंडकडून मंगळवारी नऊ गड्यांनी पराभवाचा धक्का बसला. या पराभवामुळे भारत ‘करा किंवा मरा’ अशा अवस्थेत पोहोचला आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध होबार्ट येथे पुढचा सामना खेळण्याआधी धोनीची चिंता वाढली. विराटला चौथ्या स्थानावर पाठविण्याचा आपला निर्णय किती योग्य होता, हे सांगायला पराभवानंतरही धोनी विसरला नाही. तो म्हणाला, ‘आम्ही मधली आणि तळाची फळी अधिक सक्षम बनवू इच्छीतो. रवींद्र जडेजा संघात नाही. शिवाय, स्टुअर्ट बिन्नी खेळला असता, तर विराटला तिसऱ्या स्थानावर पाठवू शकलो असतो. अक्षर पटेल किंवा अश्विन अंतिम एकादशमध्ये असते, तरी सुरेश रैना याला पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर पाठविता आले असते. त्यानंतर फलंदाजी शिल्लक राहात नाही. विराट चौथ्या स्थानावर खेळायला आला आणि गडी लवकर बाद झाले, तर विराटला १२ किंवा १३ व्या षटकात खेळपट्टीवर येण्याची संधी मिळते. अशावेळी तो एक टोक सांभाळून खेळू शकतो आणि आम्ही त्याला दुसऱ्या टोकावर साथ देऊ शकतो.’खरेतर कोहलीला नव्या स्थानावर ताळमेळ साधण्यास पुरेसा वेळ हवा. शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्या लवकर बाद होण्यामुळे समस्या बिकट होत आहे. डावखुरा धवन २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफीत ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’चा पुरस्कार जिंकल्यापासून संघात आहे. यादरम्यान विदेशात त्याने केवळ दोन वन-डे शतके ठोकली. गोलंदाजी ही तर संघाची फार मोठी डोकेदुखी. कमकुवत माऱ्यामुळे तिरंगी मालिकेत सपाटून मार खावा लागला आणि आता स्पर्धेबाहर होण्याची वेळ आली. आॅस्ट्रेलिया- इंग्लंड हे शुक्रवारी होबार्ट येथे एकमेकाविरुद्ध खेळतील. या सामन्यातील विजयी संघ १ फेब्रुवारी रोजी पर्थमध्ये होणाऱ्या अंतिम लढतीसाठी पात्र ठरणार आहे.(वृत्तसंस्था)कोहली मेलबोर्न आणि ब्रिस्बेनच्या दोन्ही सामन्यात गरज नसताना फटका मारून बाद झाला. त्याने क्रमश: नऊ आणि चार धावा केल्या आहेत. अशावेळी त्याला तिसऱ्या स्थानावर पाठविले जाते की मग चौथ्या स्थानावर कायम ठेवले जाते हे पाहणे रंजक ठरेल. कोहलीने तिसऱ्या स्थानावर खेळून २१ पैकी १४ वन डे शतके झळकविली आहेत.