शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषकातील भारत - पाक सामन्याचा इतिहास

By admin | Updated: March 19, 2016 09:34 IST

विश्वचषकात भारताने पाकिस्तानला आत्तापर्यंत १० वेळा पराभूत केले आहे. टी- २० मध्ये ४ वेळा तर एकदिवसीय सामन्यात ६ वेळा भारताने हा पराक्रम केला आहे

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - विश्वचषकात भारताने पाकिस्तानला आत्तापर्यंत १० वेळा पराभूत केले आहे. टी- २० मध्ये ४ वेळा तर एकदिवसीय सामन्यात ६ वेळा भारताने हा पराक्रम केला आहे. त्या आठवणींवर एक नजर..
 
१९९२ सिडनी, ऑस्ट्रेलिया 
१९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला. या मॅचमध्ये भारताच्या विजयाचा हिरो ठरला सचिन तेंडुलकर. सचिननं या मॅचमध्ये ५४ रन केल्या, तसंच १ विकेटही काढली. भारतानं ही मॅच ४३ रननं जिंकली. 
 
१९९६ बंगळुरू, भारत
आमिर सोहेल आणि व्यंकटेश प्रसाद यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक चकमकींमुळे हा सामना क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहिल. भारतानं ही मॅच ३७ धावांनी जिंकली. 
 
१९९९ मॅन्चेस्टर, इंग्लंड
२२७ रन्सचे माफक आव्हान पार करणं पाकिस्तानला अवघड झालं ते व्यंकटेश प्रसादमुळे. या मॅचमध्ये प्रसादनं पाकिस्तानच्या ५ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, आणि भारतानं ही मॅच ४७ धावांनी जिंकली. 
 
२००३ सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका
भारतानं ही मॅच जिंकली ती सचिन तेंडुलकरच्या अविस्मरणीय खेळीमुळे. या मॅचमध्ये सचिनचे शतक फक्त २ धावांनी हुकले, तरी सचिनची ही खेळी क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहिल. या मॅचमध्ये भारताचा ६ गडी आणि २६ चेंडू राखून विजय झाला. 
 
२००७ डर्बन, दक्षिण आफ्रिका
पहिल्याच टी २० वर्ल्ड कपमध्ये हे पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आले, आणि हा सामना टाय झाला. अखेर बॉल आऊटच्या माध्यमातून भारताचा या मॅचमध्ये विजय झाला.
 
२००७ जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका 
पहिल्याच टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला तो फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून. जोगिंदर शर्मानं मिसबाहची विकेट घेतली आणि भारतानं टी-२० वर्ल्ड कप जिंकला.
 
२०११ मोहाली, भारत
जेव्हा तुम्ही सचिनचे ४ कॅच सोडाल, तेव्हा मॅच जिंकणं अशक्यच होऊन बसेल. पाकिस्ताननं हे केलं २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये आणि त्यामुळे पाकिस्तानचा या मॅचमध्ये २९ रन्सने पराभव झाला. 
 
२०१२ कोलंबो, श्रीलंका
विराट कोहलीच्या ७८ रनच्या खेळीमुळे टी २० वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. ही मॅच भारतानं ८ विकेट आणि ३ ओव्हर राखून अगदी सहज जिंकली.
 
२०१४ मिरपूर,  बांगलादेश
२०१४ साली बांगलादेशात झालेल्या विश्वचषकात टीम इंडियानं उपविजेतेपद मिळवलं. त्या स्पर्धेच्या साखळी फेरीत भारतानं पाकिस्तानवर मात केली होती. मिरपूरच्या मैदानात टीम इंडियानं पाकिस्तानला सात विकेट्सनी सहज लोळवलं आणि पाकिस्तानवर ट्वेन्टी२० विश्वचषकातला चौथा विजय साजरा केला.
 
२०१५ अॅडलेड, ऑस्ट्रेलिया
या मॅचमध्येही भारताचा संकटमोचक ठरला विराट कोहली. या मॅचमध्ये कोहलीने १०७ धावांची खेळी केली, आणि भारताला विजय मिळवून दिला.