शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

त्यावेळी पहिली कसोटी गमावल्यानंतरही भारताने जिंकली होती कसोटी मालिका

By admin | Updated: March 3, 2017 17:15 IST

मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने याआधी केलेला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - ऑस्ट्रेलियाविरुद्घच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला अनपेक्षितरित्या दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघासमोरही  मालिकेत पुनरागमन करण्याचे आव्हान आहे. मात्र मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने याआधी  केलेला आहे. 
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने तीनवेळा पहिली कसोटी गमावल्यानंतरही कमबॅक करत कसोटी मालिका जिंकल्या आहॆत. 1972-73 साली इंग्लंडविरुद्ध, 2001 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 साली श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने  केला होता.
त्यापैकी 1972-73 साली इंग्लंडविरुद्ध झालेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दिल्लीत झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. मात्र अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने  कोलकाता आणि चेन्नईत झालेल्या दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर चौथी आणि पाचवी कसोटी अनिर्णित राखत मालिका जिंकली. 
त्यानंतर 2001 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ऐतिहासिक कसोटी मालिकेत मुंबईतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र गांगुलीची आक्रमक कप्तानी आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मणच्या संस्मरणीय कामगिरीच्या जोरावर भारताने कोलकाता आणि चेन्नईतील सामने जिंकत ही मालिका 2-1 अशा फरकाने खिशात घातली होती. 
गेल्यावर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला गॉल येथील पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र  कोलंबोत झालेले पुढचे दोन्ही सामने जिंकून या मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला होता.