शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
3
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
4
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
5
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
7
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
8
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
9
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
10
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
11
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
12
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
13
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
14
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
15
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
16
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
17
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
18
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
19
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

धोनीच्या नेतृत्वामध्ये कमतरता

By admin | Updated: October 27, 2015 02:45 IST

मुंबईत झालेल्या निर्णायक सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर भारताचे माजी दिग्गज फलंदाज लिट्ल मास्टर सुनील गावसकर यांनी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर जोरदार टीका करताना या पराभवाला

नवी दिल्ली : मुंबईत झालेल्या निर्णायक सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर भारताचे माजी दिग्गज फलंदाज लिट्ल मास्टर सुनील गावसकर यांनी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर जोरदार टीका करताना या पराभवाला त्याला जबाबदार धरले. धोनीच्या नेतृत्वामध्ये कल्पकतेची आणि प्रयोगशीलतेची कमतरता राहिल्याने भारताला पराभवास सामोरे जावे लागले, असे गावसकर यांनी सांगितले.
गोलंदाजी बदलण्याच्या निर्णयावर धोनीच्या नेतृत्वामध्ये कल्पकता बघण्यास मिळाली नाही. त्यामुळे गोलंदाजीमध्ये त्याच्याकडे जास्त विकल्प राहिले नाहीत. याआधी त्याने गोलंदाजीत काही बदल केले; ेमात्र कोणालाही बळी घेण्यात यश आले नाही, असे गावसकर म्हणाले. गोलंदाजी भारताचा सर्वांत मोठा चिंतेचा विषय बनला असून, त्यामुळेच वानखेडेवर भारताला मोठा पराभव स्वीकारावा लागला, असेही गावसकर यांनी सांगितले.
गोलंदाजीबाबत गावसकर म्हणाले, की सध्याच्या घडीला गोलंदाजी भारतीय संघासाठी सर्वांत मोठी चिंता आहे. टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत आपल्या गोलंदाजांची कामगिरी आपण पाहिलीच आहे. वानखेडेच्या खेळपट्टीवर चेंडू फिरकी आणि उसळी घेत होता; मात्र आपल्या गोलंदाजांनी त्यानुसार गोलंदाजी केली नाही.
आपल्या गोलंदाजांनी १३५च्या वेगाने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर आखूड मारा केला. या वेगाने तुम्ही आफ्रिकेच्या फलंदाजांवर आखूड टप्प्यांचा मारा करू शकत नाही. जर तुम्हाला बाउन्सर टाकायचे असतील, तर तुमचा वेग किमान १४५ किमी प्रतितास इतका असावा. या सामन्यात आश्विनच्या अनुपस्थितीत भारतीय उतरले होते. आगामी कसोटी मालिकेत तो खेळेल, अशी आशा आहे, असेही गावसकर म्हणाले. (वृत्तसंस्था)