शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

...श्रेय फिरकीपटूंना मिळाले नाही

By admin | Updated: December 2, 2015 04:09 IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेत भारतीय फिरकीपटूंनी ५० पैकी ४७ बळी घेतले असले, तरी लेग स्पिनर अमित मिश्रा मात्र निराश आहे. खेळपट्टीच्या स्वरूपावरून

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेत भारतीय फिरकीपटूंनी ५० पैकी ४७ बळी घेतले असले, तरी लेग स्पिनर अमित मिश्रा मात्र निराश आहे. खेळपट्टीच्या स्वरूपावरून सुरू असलेल्या चर्चेमुळे रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा आणि मिश्रा यांची कामगिरी झाकोळली गेली. आवश्यक ते श्रेय मिळाले का, याबाबत बोलताना मिश्रा म्हणाला, ‘‘खेळपट्टीबाबतच चर्वितचर्वण झाल्यामुळे आम्हाला आवश्यक ते श्रेय मिळाले नाही. श्रीलंकेतही आम्हाला फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या मिळाल्या. आम्ही तेथेही चांगली गोलंदाजी केली. फिरकीपटूंनी जर चांगली कामगिरी केली, तर किमान उल्लेखनीय कामगिरीसाठी तरी त्यांची प्रशंसा करायला हवी. फिरकीपटूंना केवळ या खेळपट्ट्यांमुळे विकेट मिळालेल्या नाहीत. आम्ही भारताबाहेरही चांगली कामगिरी केली आहे.’’ मिश्राच्या मते फिरकीपटूंविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे तंत्र सदोष असल्यामुळे त्यांना नुकसान सोसावे लागले. आश्विन (२४ बळी) व जडेजा (१६ बळी) यांच्या तुलनेत दोन कसोटी सामन्यांत ७ बळी घेणारा मिश्रा म्हणाला, ‘‘उपखंडाबाहेर आम्हाला अधिक उसळी असलेल्या खेळपट्ट्यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे अन्य संघ ज्या वेळी भारतात येतात त्या वेळी त्यांना फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांच्या आव्हानाला समोरे जावे लागते. खेळपट्ट्यांसोबत जुळवून घेणे महत्त्वाचे ठरते. दक्षिण आफ्रिका संघाला गृहपाठ करणे आणि फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर फलंदाजी करताना तंत्रामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. दक्षिण आफ्रि केच्या फलंदाजांना आम्ही आक्रमक फलंदाजी करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे ते दडपणाखाली आहेत.’’मिश्रा पुढे म्हणाला, ‘‘गेल्या १५ वर्षांत मायदेशात आम्हाला अशा खेळपट्ट्या मिळालेल्या नाहीत. ज्या वेळी आम्ही विदेशात खेळायला जातो त्या वेळी तेथील खेळपट्ट्या यजमान संघासाठी अनुकूल असतात. आम्ही दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये स्विंगला अनुकूल व उसळी असलेल्या खेळपट्ट्यांवर खेळलेलो आहोत. अशा परिस्थितीत आम्ही मालिका बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरलो. त्यामुळे येथे खेळताना त्यांनी खेळपट्ट्यांबाबत तक्रार करायला नको.’’ दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे मनोधैर्य ढासळलेले आहे. त्यांना फिरकी गोलंदाजी खेळण्यास अडचण भासत आहे. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज दडपणाखाली खेळत असल्यामुळे बाद होत आहेत. त्यांनी खेळपट्टीवर तळ ठोकण्याचे धैर्य दाखविणे आवश्यक आहे.’’(वृत्तसंस्था)