शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंसाठी सकारात्मक वातावरण तयार करावे

By admin | Updated: May 23, 2016 01:17 IST

देशातील खेळाडूंप्रति सकारात्मक वातावरण तयार करणे आणि रिओ आॅलिम्पिकसाठी खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे

नवी दिल्ली : देशातील खेळाडूंप्रति सकारात्मक वातावरण तयार करणे आणि रिओ आॅलिम्पिकसाठी खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. खेळाचा विचार करताना जय-पराजय यापेक्षा खिलाडूवृत्तीमुळे भारताने जगात आपली ओळख निर्माण करावी, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी क्रीडामंत्री म्हणून सर्वानंद सोनोवाल यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. आकाशवाणीवर प्रसारित ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘आॅलिम्पिक स्पर्धा सुरू होते त्या वेळी आम्ही सुवर्णपदकांच्या शर्यतीत किती पिछाडीवर आहोत, याची चर्चा करतो. रौप्य मिळाले की नाही, कांस्यपदकावर समाधान मानायचे का, याचेही चर्वितचर्वण होत असते.’क्रीडा विभागात आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत, याची कबुली देताना पंतप्रधानांनी देशात खेळाचे वातावरण तयार होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मोदी म्हणाले,‘रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आपल्या सर्व खेळाडूंसाठी उत्साहाचे वातावरण तयार करायला हवे. प्रत्येक बाबीसाठी जय-पराजय हा निकष न लावता खिलाडूवृत्तीने भारताने जगात आपले स्थान निर्माण करायला हवे. खेळासोबत जुळलेल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतात खेळाचे वातावरण तयार करण्याचे मी देशातील नागरिकांना आवाहन करतो.’(वृत्तसंस्था)