शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

कार्लसनकडे १ गुणाची आघाडी; आनंदचे पारडे मानसिकदृष्ट्या वरचढ

By admin | Updated: November 21, 2014 00:27 IST

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतला आजचा ९वा विजय अवघ्या २० चालीत बरोबरीत सुटला आणि जगभरातल्या बुद्धीबळ खेळाडूंकडून, अभ्यासकांकडून, प्रेक्षकांकडून आश्चर्याच्या प्रतिक्रिया उमटल्या

जयंत गोखले,जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतला आजचा ९वा विजय अवघ्या २० चालीत बरोबरीत सुटला आणि जगभरातल्या बुद्धीबळ खेळाडूंकडून, अभ्यासकांकडून, प्रेक्षकांकडून आश्चर्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. गेल्या अनेक वर्षातल्या जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धा विलक्षण अटीतटीने लढल्या जातायत. प्रत्येक डावागणिक ही चुरस वाढत जाताना आढळून आलेली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे अत्यंत मर्यादित असलेली डावांची संख्या. अवघ्या १२ डावांच्या मालिकेत जेव्हा प्रत्येक खेळाडूला फक्त सहा वेळा पांढरी मोहरी मिळणार असतात तेव्हा त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेण्याकडेच दोन्ही खेळाडूंचा कल असतो.तमाम बुद्धीबळ विश्वात सर्वाधिक लांबलेल्या अनातोली कार्पोव्ह विरुद्ध गॅरी कास्पारोव्ह यांच्यातल्या १९८४ सालच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अशाा कमी चालीत बरोबरी होत होत्या. सलग १७ सामने बरोबरीत सुटले होते आणि तेदेखील ३० खेळ्या होतायत न होतायत त्यातच!या पार्श्वभूमीवर आजच्या बरोबरीमुळे वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. मुख्य म्हणजे, लढवय्या कार्लसननी पांढरी मोहरी असून आनंदला २० खेळ्यांतच कसे मोकळे सोडले? कार्लसन थकला असेल का? का कार्लसनला आनंदच्या तयारीचे दडपण आले होते का? असे एक ना अनेक तर्क मांडले जातायत.आनंदची तयारी अफलातून होती यात काही संशयच नाही. आनंदच्या ११ पासून १४ पर्यंतच्या चारही खेळ्या या कार्लसनसाठी नवीन होत्या आणि आनंदनी ज्या झपाट्याने त्या खेळला त्यावरून त्याचा आत्मविश्वास कार्लसनला धडकी भरवून गेला असेल असं वाटतंय. कारण, कार्लसनने भरपूर विचार करून सरळ सरळ बरोबरीचीच योजना आखली आणि आनंदच्या तयारीपुढे नमते घेतले. २० व्या चालीला बरोबरी मान्य केली तेव्हा आनंदच्या घड्याळात कार्लसनपेक्षा ५० मिनिटे जास्त होती!आता शेवटचे तीन डाव उरलेत आणि त्यातल्या दोन डावांत आनंदला पांढरी मोहरी आहेत... त्या एका दुर्दैवी पराभवानंतर आनंदने स्वत:ला कमालीचे सावरले आहे आणि प्रत्येक डावागणिक त्याचा आत्मविश्वास वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते आहे.फक्त एक विजय, बाज....!