शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

पुढीलवर्षी रंगणार अंधांचा क्रिकेट विश्वचषक

By admin | Updated: October 7, 2015 03:06 IST

अंध खेळाडूंच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्याचसाठी अंध क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर

- महेश चेमटे , मुंबई
अंध खेळाडूंच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्याचसाठी अंध क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये या स्पर्धचे आयोजन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंध क्रिकेट संघटनेचे सेक्रेटरी रमाकांत साटम यांनी ‘लोकमत’ला दिली. मुंबईतील हिंदू जिमखाना व
इस्लाम जिमखाना येथे सध्या
अंधांची महाराष्ट्र चषक क्रिकेट स्पर्धा सुरु आहे, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
भारतीय अंध क्रिकेट संघाने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या अंध विश्वचषकावर पाकिस्तानचा पराभव करुन नाव कोरले. विश्वचषकात पाकिस्तान, बांग्लादेश, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज , श्रीलंका या देशांसह १३ देश सहभागी होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात तब्बल ४७ सामने खेळवण्यात येणार आहेत. मुंबईसह पुणे, बंगळूर, केरळ येथे हे सामने रंगतील. त्याच बरोबर ओडिशा, कटक, राजस्थान या ठिकाणीही काही सामने आयोजित करण्याचा विचार सध्या सुरु आहे. विश्वचषकाच्या विजयानंतर भारतीय संघाची पंतप्रधानांसह हरियाणा सरकारने दखल घेतली पण महाराष्ट्राच्या सरकारने साधे अभिनंदन देखील केले नसल्याची खंत साटम यांनी व्यक्त केली.
अंध खेळाडूंच्या शारीरिक व सामाजिक विकासासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तसेच स्पर्धात्मक गुणांना देखील वाव मिळतो. सध्या आपल्याकडे अंध क्रिकेटसाठी कोणत्याही प्रकारे मदत करण्याची तरतूद नाही.
अंध क्रिकेटसाठी शासनाकडून अनुदानाची अपेक्षा आहे. जगातील श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून ओळखली जाणाऱ्या बीसीसीआयने अंध क्रिकेट संघटनेला अद्याप मान्यता दिलेली नाही. गेली दोन वर्ष कोणत्याही मदतीशिवाय आम्ही विश्वचषकावर नाव कोरले. किमान आता तरी सरकार पातळीवर तसेच बीसीसीआय आमच्याकडे लक्ष देईल, अशी माफक अपेक्षा साटम यांनी व्यक्त केली.

...अशी होते सामन्याला सुरुवात
या सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकच्या चेंडूत छर्रे टाकण्यात येतात. जेणे करुन त्या आवाजाच्या दिशेने ते हालचाल करु शकतील. गोलंदाजाने गोलंदाजी करताना ‘अंडरआर्म’ करावी. गोलंदाजाने ‘प्ले’ असे बोलल्यानंतर फलंदाज ‘येस’ असे बोलल्यानंतर सामना सुरु होतो. पूर्णत: अंध जेव्हा एक धाव घेतो, तेव्हा ते दोन धाव म्हणून गृहित धरले जाते.