शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

फलंदाजांची शरणागती, भारत सर्व बाद २००

By admin | Updated: January 30, 2015 12:44 IST

सलामीवीर अजिंक्य रहाणे दमदार ७१ धावांची खेळी वगळता उर्वरित भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारल्याने इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यात भारताने सर्व गडी गमावत अवघ्या २०० धावा केल्या.

ऑनलाइन लोकमत 
पर्थ, दि. ३० - सलामीवीर अजिंक्य रहाणे दमदार ७१ धावांची खेळी वगळता उर्वरित भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारल्याने इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यात भारताने सर्व गडी गमावत अवघ्या २०० धावा केल्या आहेत. भारताच्या सहा फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आलेली नाही. 
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत शुक्रवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पर्थ येथे वन डे सामना सुरु आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन ही जोडी सलामीला उतरली. दोघांनी सावध सुरुवात करत भारताला अर्धशतकी सलामी केली. शिखर धवन ३८ धावांवर असताना ख्रिस वॉक्सने त्याचा अडसर दूर केला. गेल्या काही सामन्यांपासून शिखर धवन अपयशी ठरला असून आज चांगली सुरुवात करुनही त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात त्याला अपयश आले. शिखर धवन बाद झाला तेव्हा भारत १ बाद ८३ धावा अशा स्थितीत होता. मात्र त्यानंतर भारताची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. अजिंक्य रहाणे एका बाजूने नेटाने किल्ला लढवत असताना अन्य फलंदाजांना त्याला अपेक्षीत साथ दिली नाही. विराट कोहली ८ धावा, सुरेश रैना एक धावा, अंबाटी रायडू १२ धावा, कर्णधार महेंद्रसिंग धोनी १७ धावा, स्टुअर्ट बिन्नी ७ धावा, रविंद्र जडेजा ५ धावा आणि अक्षर पटेल १ धावांवर बाद झाला. त्यामुळे १ बाद ८३ धावा अशा स्थितीत असलेल्या भारताची अवस्था ९ बाद १६५ झाली. भारताचे आठ फलंदाज फक्त ८२ धावांमध्येच तंबूत परतले. मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा या तळाच्या जोडीने ३५ धावांची भागीदारी करत भारताला दोनशेचा टप्पा गाठून दिला. 
इंग्लंडतर्फे स्टिव्हन फिनने ३ तर ख्रिस वॉक्स, स्टुअर्ट ब्रॉड, मोईन अली यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जेम्स अँडरसनने एक विकेट घेतली.