शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सिडको इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:08 AM

सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग सुकर झाला आहे. या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी लागू करण्यात आलेली १00 टक्के सहमतीची अट शिथिल करण्यात आली आहे.

नवी मुंबई : सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग सुकर झाला आहे. या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी लागू करण्यात आलेली १00 टक्के सहमतीची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ ५१ टक्के रहिवाशांची सहमती मिळाल्यास इमारतीची पुनर्बांधणी करता येणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंंद्र फडसवीस यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतींतून राहणाºया हजारो रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.नवी मुंबई विभागात सिडकोने बांधलेल्या इमारती अल्पवधीतच निकृष्ट ठरल्या आहेत. या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्र्बांधणीचा प्रश्न मागील वीस वर्षांपासून चर्चिला जात आहे. परंतु राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी २.५ एफएसआय देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. हा निर्णय जाहीर करताना पुनर्बांधणीसाठी सोसायटीतील ७0 टक्के रहिवाशांची सहमती बंधनकारक करण्यात आली. तर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १00 टक्के सहमती असल्याशिवाय पुनर्बांधणीला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुनर्बांधणीच्या कामाला खीळ बसली होती. या पार्श्वभूमीवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी संपूर्ण सहमतीची अट शिथिल करावी, या मागणीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. पुनर्बांधणी रखडल्याने निर्माण झालेल्या परिस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली होती. हजारो रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सहमतीची अट १00 टक्क्यावरून ५0 टक्के इतकी करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी सभागृहात केली होती. त्यानुसार सोसायटीतील ५१ टक्के रहिवाशांची सहमती असल्यास इमारतीची पुनर्बांधणी करता येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्यामुळे निर्णय होवूनही मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या पुनर्बांधणीच्या कामाला चालना मिळण्याची शक्यता आहे.