शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर जागरूक मतदारांंचे मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 00:42 IST

उरण विधानसभा मतदारसंघात असलेल्या विविध प्रकल्प आणि कंपन्यांमुळे उरण औद्योगिक नगरी म्हणून नावारूपाला येऊ लागली आहे.

- मधुकर ठाकूर उरण : उरण विधानसभा मतदारसंघात असलेल्या विविध प्रकल्प आणि कंपन्यांमुळे उरण औद्योगिक नगरी म्हणून नावारूपाला येऊ लागली आहे. या मतदारसंघात कोणत्या ना कोणत्या कारणावरून सातत्याने आंदोलने होत असतात. त्यामुळे हा मतदारसंघात अत्यंत जागरूक मतदार म्हणून ओळखला जात आहे. दहा वर्षांपूर्वी नव्याने निर्माण झालेल्या या मतदारसंघात मागील दोन विधानसभेच्या निवडणुकीत एकाच पक्षाला संधी न देता प्रत्येक वेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार निवडून दिले आहेत. तिसऱ्यांदा सोमवारी पार पडलेल्या या निवडणुकीतही मतदारसंघात विकासकामे करण्याची तयारी असलेल्या भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना मतदारांनी निवडून दिले आहे.

२००९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या उरण विधानसभा मतदारसंघात पहिल्यादाच झालेल्या निवडणुकीत शेकापचे विवेक पाटील यांना निवडून दिले होते. मोठ्या विश्वासाने निवडून दिलेले आमदार विवेक पाटील हे पाच वर्षांत नारिकांच्या समस्या आणि मतदारांंचे प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरले. त्यानंतर २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविल्या. विकासाचे आणि उरणकरांच्या समस्या सोडविण्यासाठी उरणचाच आमदार हवा या प्रमुख राजकीय मुद्द्यावर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शेकापचे विवेक पाटील यांना दुहेरी संधी न देता निवडणुकीत सेनेच्या मनोहर भोईर यांना मतदारांनी विजयाचा कौल दिला.

सुदैवाने राज्यात आणि केंद्रातही सेना-भाजप सत्तेवर आले. मात्र, दोन्हीकडे सत्ता असतानाही आमदार मनोहर भोईर यांना मात्र उरण मतदारसंघाचा विकास करता आलेला नाही. उरण विधानसभा मतदारांच्या हाती विकासकामांचा भोपळाच आला. बेरोजगारी, जेएनपीटी, साडेबारा टक्के भूखंडवाटपाचा प्रश्न, वाहतूककोंडी, रु ग्णालय उभारणी आदी सामान्यांना भेडसावणारे जिव्हाळ्याचे प्रश्नही मनोहर भोईर यांना सोडविता आलेले नाहीत. परिणामी, निष्क्रिय आणि बिनकामाचा आमदार म्हणून जनतेने मनोहर भोईर यांच्या माथी मारला आणि दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून देतात त्यांना घरचा रस्ता दाखवला.

उरण विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे महेश बालदी यांनी स्वबळावर निवडणूक लढविली होती. मात्र, मतदारांनी बालदी यांना चौथ्या क्रमांकावर फेकून दिले होते. मात्र, पराभवाची तमा न बाळगता महेश बालदी यांनी पराभवाच्या दिवसांपासूनच मतदारसंघात पुढल्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. नगरसेवक, नगराध्यक्ष, जेएनपीटी ट्रस्टी, भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस आदी पदे भूषविणाºया बालदी यांनी उरण मतदारसंघात संघटनेची मजबूत बांधणी केली. राज्य आणि केंद्रातही सेना-भाजप सत्तेवर असलेल्याचा मोठ्या खुबीने वापर करून उरण मतदारसंघात सुमारे ५०० कोटींची विकासकामे केली.

लोकप्रतिनिधी नसतानाही बालदी यांनी केलेल्या कामांची मतदारांनाही चांगलीच भुरळ घातली. तसेच त्यांनी सत्तेतील ओळखीचा फायदा उठवत विविध योजना आणि कोट्यवधींचा आमदार, खासदार निधीही मतदारसंघात विकासकामांसाठी खर्ची घातला. बालदी यांच्या या विकासकामांच्या धडाक्याने मतदारही चांगलेच प्रभावित झाले. त्याचा फायदा उठवत त्यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून समर्थन दिले जात होते. विरोधक विशेषत: शिवसेना मात्र असे काही घडणारच नाही या अंध विश्वासावर ठाम होती.

निवडणुकीच्या आखाड्यातही बालदी यांच्या विरोधात विरोधकांनी जातीपातीचे आणि बदनामी करण्याच्या सुरू केलेल्या हीन राजकारणाला मतदारांनी भीक घातली नाही. त्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघातील २० पंचायत समितीमधील विरोधकांचे वर्चस्व असलेल्या चाणजे, केगाव, गुळसुंदे, पळस्पे आणि उरण शहरात मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून महेश बालदी विजयी झाले.च्यासाठी बालदी यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जुंपली तर उरण, पनवेल, खालापूर तालुका अध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवकांचीही प्रचारात उघडपणे साथ लाभली. शेकापचे विवेक पाटील यांना मतदारसंघातील २० पंचायत समितीमधील जासई, विंधणे, आपटा, करंजाडे, केळववणे, पोयंजे, वडघर, गव्हाण, वहाळ या नऊ तर भेडखळ, नवघर, आधारे, चिरनेर, चांभार्ली, चौक, वडगाव, वासांबे या सात पंचायत समितीमध्ये अधिक मतदान होऊनही पराभव पत्करावा लागला.

टॅग्स :uran-acउरणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019