शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

शांततेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार, रबाळे पोलिसांनी केले मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 3:08 AM

मराठा मोर्चा आंदोलनानंतर निर्माण झालेल्या संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामस्थ संघटना एकवटल्या आहेत. स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या घणसोली गावात शनिवारी सकाळी एक बैठक बोलाविण्यात आली होती.

नवी मुंबई : मराठा मोर्चा आंदोलनानंतर निर्माण झालेल्या संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामस्थ संघटना एकवटल्या आहेत. स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या घणसोली गावात शनिवारी सकाळी एक बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत रबाळे पोलिसांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, तसेच सामाजिक शांततेत बाधा निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय गोडसे यांनी केले.कोपरखैरणेतील घटनेनंतर ग्रामस्थांत कमालीचा असंतोष पसरला आहे, त्याचे पडसाद शहरातील इतर गावांतही उमटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रबाळे पोलिसांनी ग्रामस्थांशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने शनिवारी घणसोलीतील हनुमान मंदिराच्या प्रांगणात एका बैठकीचे आयोजन केले होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने राज्यभरात ५७मोर्चे काढले; परंतु बंद आंदोलनादरम्यान, काही समाजकंटकांच्या कृतीमुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. सामाजिक सलोखा बिघडविणाºया प्रवृत्तींची गय केली जाणार नाही. हिंसक आंदोलनाला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यास पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांशी समन्वय साधावा, असे आवाहन गोडसे यांनी केले. याप्रसंगी परिवहन समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटील यांचीही भाषणे झाली.या बैठकीला देवस्थान संस्थेचे अध्यक्ष चेतन पाटील, नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील, नगरसेवक घनश्याम मढवी, उत्तम म्हात्रे, गावकीचे सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष शेखर मढवी, गौरव म्हात्रे आदी उपस्थित होते.घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करान्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु या आंदोलनात सर्वसामान्य भरडले जातात. त्यांच्या मालमत्तेचे नुकसान केले जाते. या कृत्याचे कोणीच समर्थन करणार नाही, त्यामुळे कोपरखैरणेतील घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गावकीचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांनी या बैठकीत केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई