शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगार मेळाव्याची परंपरा ३८ वर्षांनंतर खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 23:42 IST

कोरोनामुळे ऑनलाइन समारंभ : माथाडी भवनमध्ये निवडक पदाधिकारी राहणार उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित होणाऱ्या कामगार मेळाव्याची परंपरा ३८ वर्षांनंतर खंडित होणार आहे. कोरोनामुळे जाहीर मेळाव्याऐवजी माथाडी भवनमध्ये निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे. या वेळी ‘माथाडी भूषण’ पुरस्काराचेही वितरण करण्यात येणार आहे.

 महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २५ सप्टेंबरला एपीएमसीमध्ये माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यामध्ये प्रत्येक वर्षी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर ज्येष्ठ नेते उपस्थित राहत असतात. माथाडी कामगारांचे प्रश्न व चळवळीवर चर्चा या मेळाव्यात होत असते. अनेक प्रश्नांना या मेळाव्यातून वाचा फोडली जाते व ते शासनाकडून सोडवून घेतले जातात. राज्यातून १० हजारपेक्षा जास्त कामगार या मेळाव्याला उपस्थित राहत असतात. राजकीयदृष्ट्याही या मेळाव्याला विशेष महत्त्व असते. अनेक आमदार, मंत्री व लोकप्रतिनिधी मेळाव्यास आवर्जून उपस्थित असतात. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मुुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील अनेक लोकसभा व विधानसभा मतदारसंघांत माथाडी कामगारांची मते निर्णायक ठरत असल्यामुळेही लोकप्रतिनिधी कामगारांशी स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी मेळाव्यास येत असतात.

या वर्षी कोरोनामुळे ३८ वर्षांमध्ये पहिल्यांदाच माथाडी कामगारांचा मेळावा रद्द करण्यात आला आहे. कांदा - बटाटा मार्केटमधील जाहीर मेळाव्याऐवजी माथाडी भवनमध्ये कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्यास राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कामगारांना हा कार्यक्रम आॅनलाइन पाहता येणार आहे. प्रत्येक वर्षी दिला जाणारा ‘माथाडी भूषण’ पुरस्काराचेही या वेळी वितरण करण्यात येणार आहे.अनेक प्रश्नांना वाचा फोडली जाते व ते शासनाकडून सोडवून घेतले जातात.माथाडी कामगारांचे प्रश्न व चळवळीवर चर्चा या मेळाव्यात होत असते.