शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाच्या योजना निराधार

By admin | Updated: November 12, 2014 02:16 IST

झोपडपट्टीमुक्त ठाणो शहर, खाडी किना:याचा विकास, पाण्याचे रिमॉडलिंग, सीव्हेरज असे महत्वाचे प्रकल्प ठाणो महापालिकेने (ठामपा) गेल्या काही वर्षापूर्वी हाती घेतले आहेत.

अजित मांडके - ठाणो
झोपडपट्टीमुक्त ठाणो शहर, खाडी किना:याचा विकास, पाण्याचे रिमॉडलिंग, सीव्हेरज असे महत्वाचे प्रकल्प ठाणो महापालिकेने (ठामपा) गेल्या काही वर्षापूर्वी हाती घेतले आहेत. यातील वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेन्ट आणि रिमॉडलींग प्रकल्पांना केंद्राने मंजुरी दिली असली तरी आता जेएनयूआरएम अर्थात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण अभियानच बंद होणार असल्याने, हे प्रकल्प कागदावरच राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 
याच योजनेच्या भरवशावर पालिकेने राजीव आवास योजना आणि नाल्यांच्या एकात्मिक विकास प्रकल्पासाठी सुमारे 2 हजार कोटींचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले आहेत. परंतु,केंद्राकडून अद्याप यासंदर्भात कोणताही सिग्नल न आल्याने या प्रकल्पांच्या अभ्यासासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्चही पाण्यात जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 
 
वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट 
तत्कालीन महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या संकल्पनेतून ठाण्याच्या खाडीचा विकास (वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट) करण्याची योजना पुढे आली होती. खाडीचा विकास करताना बोटिंग, जलक्रीडा, जलवाहतूक, मॅनग्रोव्ह टेल्स, जॉगिंग ट्रॅक्स, सायकल ट्रॅक्स, मिनी पिकनीक सेंटर आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. 
ठाणो शहर, खारेगाव, साकेत, बाळकूम, कोलशेत, गायमुख, मोघरपाडा, कासारवडवली, कावेसार, रेती बंदर, मुंब्रा आणि दिवा आदी ठिकाणच्या खाडी किना:याचा या माध्यमातून विकास होणार आहे. या प्रकल्पासाठी 125 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही प्रकल्पांना तत्कालीन केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. परंतु सरकार बदलल्यानंतर जेएनएनयूआरएम ही योजनासुध्दा बंद झाली. त्यामुळे आता केंद्राने निधी नसल्याचे कारण पुढे केले आहे.
 
या कार्यक्रमाअंतर्गत सुमारे एक हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. तसेच खाडी किनारी एक पंप हाऊस तयार करण्यात येणार आहे. शहरातील सर्व नाले हे खाडी किनारी जोडले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च झाला आहे.घोडबंदर, मुंब्रा आणि दिवा गावातील पाण्याच्या समस्या सोडविण्याबरोबर येथे सांडपाणी वाहिनी टाकण्याची सुमारे 7क्क् कोटींची योजना आखली आहे. ती अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविली होती. 
 
राजीव आवास योजनेचा देखील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. चार टप्प्यांत ती पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार घरे खारटन रोड आणि चेंदणी कोळीवाडा येथे उभारली जाणार आहेत. ज्या प्रभागांत ही योजना तत्काळ पूर्ण होऊ शकते,अशा 1क् प्रभागांचा सव्र्हे पूर्ण झाला आहे. यामध्ये वसंत विहार, कोपरी, सिध्दार्थनगर, म्हाडा कॉलनी, राबोडी आदी भागांचा यात समावेश आहे. याचा अभ्यास करण्यासाठी देखील पालिकेने लाखोंचा निधी खर्च केला आहे. या दोन्ही योजनांबाबत पालिकेने वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. केंद्राने निधी दिला नाही, तर या योजनांचा गाशा गुंडाळावा लागणार आहे.