शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी उद्यानाच्या प्लॅनवरून वादाची चिन्हे; वन्यजीव संरक्षणावरून पर्यावरणतज्ज्ञांचा संताप

By नारायण जाधव | Updated: March 26, 2026 12:08 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रासाठी (इको-सेन्सिटिव्ह झोन) मंजूर झालेल्या झोनल मास्टर प्लॅनवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रासाठी (इको-सेन्सिटिव्ह झोन) मंजूर झालेल्या झोनल मास्टर प्लॅनवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. २० मार्च २०२६ च्या शासन निर्णयानंतर ‘नियंत्रित विकास’च्या नावाखाली प्रत्यक्षात शहरी विस्ताराला मोकळीक दिली जात आहे का, असा सवाल पर्यावरण तज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्लॅनमुळे जंगलालगतच्या भागात मानवी हस्तक्षेप वाढण्याची शक्यता असून वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर थेट आघात होणार आहे. विशेषतः बिबट्यांसारख्या प्राण्यांचा अधिवास कमी झाल्यास मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. जलस्रोत आणि कॅचमेंट एरियामध्ये बांधकामांना परवानगी दिल्यास पूरस्थिती, भूजल पातळी आणि पाण्याच्या उपलब्धतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

बांधकामांना चालना देणारा आराखडा

स्थानिक रहिवासी, आदिवासी आणि झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत स्पष्ट धोरण नसल्याने सामाजिक असंतोष वाढू शकतो. संजय गांधी उद्यानाच्या संरक्षणासाठी झोनल प्लान असावा अशी पर्यावरणप्रेमींची मागणी होती.  मात्र, मंजूर आराखडा बांधकामांना चालना देणारा असल्याची टीका पर्यावरणप्रेमींनी केली होती. त्यानंतर त्याची अंतिम मंजुरी थांबविली होती. त्यानंतर आता १० वर्षांनी त्यास अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

आराखड्यात काय?

या आराखड्यात  रिअल इस्टेट आणि पायाभूत प्रकल्पांना संधी देण्याचा प्रयत्न असल्याची टीका होत आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमधील अवघे ३४ टक्केच वनक्षेत्र उरले असून तब्बल ६६ टक्के भाग आधीच नॉन-फॉरेस्ट असल्याने बांधकामांना अप्रत्यक्ष ग्रीन सिग्नल मिळू शकतो.

‘रेड कॅटेगिरी’ उद्योगांवर बंदीचा दावा केला जात असला, तरी इतर प्रकल्पांना सशर्त परवानगी दिल्याने पर्यावरणावर ताण वाढू शकतो. इको-टुरिझमच्या नावाखाली व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळण्याचेही संकेत आहेत.

महामुंबईतील सुविधांवर ताण येण्याची भीती

महामुंबईतील ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पालघर आणि मुंबई उपनगर या शहरांमध्ये वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन आणि वायूप्रदूषणाचे प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र सरकारने थातूरमातूर बदल करून या झोनल प्लॅनला अंतिम मंजुरी दिली आहे. मुळात हा प्लॅन बिल्डरधार्जिणा आहे. आधीच उद्यानाच्या अधिकाधिक क्षेत्रात अतिक्रमण झाले आहे. बांधकामे झाली आहेत. शासनाला उद्यानात बिल्डरांना देण्यासाठी जागा आहेत, पण वन्यजीवांसाठी नाही. - दयानंद स्टॅलीन, संचालक वनशक्ती.

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Gandhi Park Plan Sparks Controversy; Wildlife Protection Concerns Raised

Web Summary : Sanjay Gandhi National Park's zonal plan faces criticism for potentially prioritizing urban expansion over wildlife. Experts fear increased human interference, habitat loss for leopards, and water scarcity. The plan, favoring construction, may strain Mumbai's infrastructure and disregard tribal rights, prompting environmental concerns.
टॅग्स :Mumbaiमुंबई