शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

हंगामी ३०५ कर्मचारी अधांतरी

By admin | Updated: October 1, 2015 23:36 IST

पालिका कामगार संघटनेने ३०५ हंगामी कामगार भरतीची मागणी पालिका आयुक्तांकडे लावून धरली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने हा प्रश्न अधांतरी

उल्हासनगर : पालिका कामगार संघटनेने ३०५ हंगामी कामगार भरतीची मागणी पालिका आयुक्तांकडे लावून धरली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने हा प्रश्न अधांतरी अडकण्याची भीती व्यक्त होत आहे. कामगार नेते चरणसिंग टाक यांनी न्यायालयाच्या आदेशान्वये भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली.उल्हासनगर महापालिकेत ३०५ हंगामी कामगारांचा प्रश्न गेल्या १५ वर्षांपासून न्यायालय, कामगार संघटना व पालिकेच्या वादात लटकला आहे. या कामगारांना सेवेत घेण्याचा ठराव महासभेत मंजूर झाला आहे. भरतीच्या वेळी हंगामी कामगारांना अनुभवाचा फायदा होणार असून भरती प्रक्रिया दिवाळीपूर्वी सुरू करण्याची मागणी संघटनेने केली आहे. आयुक्त मनोहर हिरे यांनी कामगारांची सेवा ज्येष्ठता यादी मागविली असून न्यायालयाचा आदेश तपासून निर्णय घेणार आहेत. ३०५ कामगारांपैकी असंख्य कामगारांचा मृत्यू झाला, तर काहींचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे. अशा कामगारांच्या मुलांचा विचार होण्याची गरज असल्याची मागणी पुढे येत आहे. कामगार नेते चरणसिंग टाक, राधाकृष्ण साठे, श्याम गायकवाड, दिलीप थोरात यांनी भरतीची मागणी लावून धरल्याने हंगामी कामगारांत उत्साह निर्माण झाला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात ८०० सफाई कामगारांची संख्या कमी असल्याची माहिती त्यांनी दिली.अपुऱ्या कामगारांमुळे कचऱ्याचे ढीग साचून शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. ऐन सणासुदीच्या काळात साफसफाईचा बोजवारा उडाला.