शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रायगड पोलिसांची ‘आॅपरेशन मुस्कान’ शोधमोहीम

By admin | Updated: July 7, 2017 06:33 IST

सन २००० ते २०१७ अशा गेल्या १७ वर्षांच्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील १८ वर्षांखालील एकूण ५६ बालके हरविलेली (मिसिंग) असून

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सन २००० ते २०१७ अशा गेल्या १७ वर्षांच्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील १८ वर्षांखालील एकूण ५६ बालके हरविलेली (मिसिंग) असून, ती अद्यापपर्यंत सापडलेली नाहीत. या सर्व बालकांना शोधून काढण्याकरिता संपूर्ण जुलै महिन्यात रायगड पोलिसांच्या माध्यमातून ‘आॅपरेशन मुस्कान-३’ ही शोधमोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली आहे.या मोहिमेअंतर्गत राज्यातील इतर जिल्ह्यांसोबतच सर्व राज्यांच्या पोलिसांशी समन्वय साधून शोध घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या हरविलेल्या बालकांचा शोध लागला आहे त्या बालकांना त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचविले जाईल. ही मोहीम राबविताना जी मुले वा मुली निवारा, निवासस्थाने, रेल्वेस्थानके, बसस्थानके, रस्ते, धार्मिकस्थळे, हॉटेल, धाबे, कारखाने येथे काम करणारी बालके, भीक मागणारी बालके, कचरा गोळा करणारी बालके यांची या महिनाभराच्या कालावधीत पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणी दरम्यान बेवारस असल्याचे निदर्शनास आल्यास मुलांची नोंद घेऊन त्या मुलांचे फोटो व व्हिडीओग्राफी करून माहिती संकलित के ली जाईल. ही सर्व माहिती राज्य शासनाच्या संकेतस्थळावर व प्रसार मध्यमाद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. जनतेने सहकार्य करावे जिल्ह्यातील जनतेने या योजनेत सहकार्य केल्यास ही योजना चांगल्या पद्धतीने राबवून यशस्वी होऊ शकेल. आपल्या परिसरात बेवारस बालके आढळून आल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास अथवा रायगड जिल्हा आॅपरेशन मुस्कान मोहीम संपर्क क्र मांक (नियंत्रण कक्ष) ०२१४१-२२२१०० यावर संपर्क साधून माहिती कळवावी. जनतेने अशा बेवारस बालकांचा शोध घेऊन पोलिसांना मदत केल्यास, त्यांना मोहिमेअंती गौरविण्यात येणार आहे.