शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खारघर-बेलापूर सागरी मार्ग रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 05:04 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या माध्यमातून खारघर ते बेलापूर दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या सागरी मार्गाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या माध्यमातून खारघर ते बेलापूर दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या सागरी मार्गाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कामासाठी सिडकोने जे. कुमार इन्फ्रा या कंपनीची नियुक्ती केली आहे; परंतु या कंपनीबाबत न्यायालयीन वाद निर्माण झाल्याने तूर्तास या प्रकल्पाच्या कामाला खीळ बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. २०२० मध्ये या विमानतळावरून विमानाचे टॅकआॅफ होईल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. त्या अनुषंगाने विमानतळाला पूरक अशा दळणवळणाच्या सुविधांवर सिडकोने भर दिला आहे. रस्ते वाहतुकीसह मेट्रो व सागरी मार्गाच्या निर्मितीवर विशेष भर दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा सागरी मार्ग दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) शिवडी ते नवी मुंबई विमानतळ हा या प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे. तर खारघर, आम्रमार्ग आणि नेरुळ येथील जेट्टी असा ९.५ कि.मी. लांबीचा या मार्गाचा दुसरा टप्पा असणार आहे. २०२१ पर्यंत दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी २७० कोटी रुपये खर्च निर्धारित करण्यात आला आहे. या कामाचा ठेका जे. कुमार इन्फ्रा या कंपनीला देण्यात आला आहे; परंतु रस्त्याच्या कामातील अनियमितता आणि सुमार दर्जामुळे मुंबई महापालिकेने २०१६ मध्ये या कंपनीला सात वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले होते. हाच धागा पकडून ललित अग्रवाल यांनी सिडकोच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर जे. कुमार इन्फ्रा या कंपनीला तूर्तास सागरी मार्गाच्या कामाची वर्कआॅर्डर न देण्याचे निर्देश न्यायालयाने सिडकोला दिले आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे सिडकोचे मुख्य अभियंता एस. के. चौटालिया यांनी स्पष्ट केले आहे.>काम नियोजित वेळेतच पूर्णया प्रकरणामुळे निर्माण झालेला न्यायालयीन तिढा सुटण्यास किती काळ लागेल याचा नेम नसल्याने या मार्गाचे काम रखडण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे; परंतु सिडकोच्या संबंधित विभागाने ही शक्यता फेटाळून लावली असून प्रस्तावित मार्गाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्तकेला आहे.