शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
5
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
6
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
7
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
8
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
9
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
10
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
11
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
12
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
13
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
14
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
15
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
16
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
17
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
18
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
19
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
20
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षांनंतर न्याय

By admin | Updated: March 17, 2015 01:10 IST

मुरुड एकदरा कोळी वाड्यातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबांच्या फिर्यादी रविवारी दाखल करण्यात आल्या.

जयंत धुळप ल्ल अलिबाग
मुरुड एकदरा कोळी वाड्यातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबांच्या फिर्यादी रविवारी दाखल करण्यात आल्या. त्यानुसार तडीपार करण्यात आलेल्या मोतीराम पाटील आणि अन्य १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅड असिम सरोदे यांच्या माध्यमातून याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती.
एकदरा कोळी जात पंचायतीचा प्रमुख, हनुमान मच्छीमार सहकारी संस्थेचा अध्यक्ष आणि सध्या तडीपार असलेल्या मोतीराम चाया पाटील याच्याविरोधात २००७पासून अनेक तक्रारी मुरुड पोलिसांकडे आल्या होत्या. मात्र गेली आठ वर्षे गुन्हे दाखल करण्यात पोलिसांनी टाळाटाळ केली. मुंबई उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेत १७ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. वाळीत प्रकरणात एकाच दिवशी एकाच वेळी चार गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रश्मीकांत चंद्रकांत पाटील यांनी २००७मध्ये मोतीराम चाया पाटील अध्यक्ष असलेल्या, हनुमान मच्छीमार सहकारी संस्थेच्या सहकारी संस्थेतील भ्रष्टाचार बाहेर काढल्याने त्यांच्या कुटुंबास वाळीत टाकण्यात आले. त्यामुळे त्यांना कुटुंबासह मुंबईत गणेशनगर, वडाळा येथे राहायला जावे लागले. रश्मीकांत यांच्या तक्रारींची दखलच घेतली नाही. रश्मिकांत यांच्या कुटुंबीयांना सर्व सार्वजनिक कार्यक्रमांत येण्यास बंदी करण्यात आली. त्यांच्या कुटुंबातील महिलांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. रश्मीकांत यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

साक्ष दिल्याने
सात वर्षे वाळीत
गणेश आत्माराम दामशेट आणि नारायण जान्या पाटील या दोघांनी एकदरा गावातील जगन्नाथ मल्हारी वाघरे यांच्या बाजूने जातपंचायतीच्या विरुद्ध पोलिसांकडे साक्ष दिली होती. त्यामुळे वाघरे यांच्या कुटुंबाशी संबंध ठेवल्यामुळे दामशेट व पाटील यांना १६ जानेवारी २००८पासून वाळीत टाकण्यात आले. या प्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नारायण भिकू वाघरे यांचे काका मल्हारी वाघरे यांना वाळीत टाकल्यानंतर, त्यांच्या बोटीवर नारायण वाघरे यांनी तांडेल म्हणून काम करणे चालू ठेवल्याने व त्यांच्याशी बोलणे सुरूच ठेवल्याने वाघरे व त्यांच्या कुटुंबीयांना गावात फिरण्यास बंदी घालण्यात आली. त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या ग्रामस्थांकडून दंडाची मागणी करून दहशत निर्माण करण्यात आली. या प्रकरणीही गुन्हा दाखल केला.