शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

महागाईमुळे चोरट्यांचे लक्ष कांद्यावर, एपीएमसीमध्ये चोरीचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 02:36 IST

राज्यभर सुरू असलेल्या टंचाईमुळे चोरट्यांनीही कांद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १५ ते २० महिला व मुले प्रतिदिन कांदा चोरून नेत आहेत.

नवी मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या टंचाईमुळे चोरट्यांनीही कांद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १५ ते २० महिला व मुले प्रतिदिन कांदा चोरून नेत आहेत. चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची लेखी मागणी कांदा-बटाटा अडत व्यापारी संघटनेने बाजार समिती सचिवांकडे केली आहे.मुंबईमध्ये प्रतिदिन १२०० ते १६०० टन कांद्याची मागणी आहे; परंतु सद्यस्थितीमध्ये सरासरी एक हजार टन आवक होत आहे. बुधवारी फक्त ८९६ टन आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये कांद्याचे दर ६० ते १०० रुपये झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १३० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता चोरट्यांनीही कांद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १५ ते २० महिला व काही लहान मुले कचºयात टाकलेला खराब माल उचलण्याच्या बहाण्याने मार्केटमध्ये प्रवेश करत आहेत. मालधक्याच्या बाजूला पडलेला माल उचलताना दोन्ही गाळ्यांच्या मध्ये ग्राहकांसाठी ठेवलेल्या नमुन्यांमधूनही कांदा उचलू लागल्या आहेत. याशिवाय लिलावगृहामध्ये ठेवलेल्या मालामधूनही मोठ्याप्रमाणात कांद्याची चोरी होऊ लागली आहे. प्रतिदिन १०० ते ५०० किलो माल बाहेर नेला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. व्यापाºयांचेही नुकसान होत आहे. चोरीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. व्यापाºयांनी संघटनेच्याही हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. कांदा-बटाटा अडत व्यापारी संघाने याची दखल घेऊन बाजार समिती प्रशासनास पत्र दिले आहे.बाजार आवारामध्ये टाकून दिलेला शेतमाल गोळा करण्यासाठी लहान मुले व महिला येत आहेत. गाळ्यासमोरील कचरा उचलण्याच्या बहाण्याने चांगला मालही चोरी करून घेऊन जात आहेत. या घटना वाढू लागल्या असून, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मार्केटमध्ये अशाप्रकारे कोणालाही प्रवेश दिला जाऊ नये. खरेदी पावती नसताना एक किलो मालही बाहेर घेऊन जाऊ दिला जाऊ नये. सुरक्षारक्षक संबंधितांना आतमध्ये प्रवेश देतातच का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. चोरीच्या या घटना तत्काळ थांबविण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही व्यापाºयांनी दिला आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी मुख्य सुरक्षा अधिकारी अविनाश काकडे यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.सुरक्षा व्यवस्था कडक करावीमार्केटच्या प्रवेशद्वारातून कचरा गोळा करण्याच्या बहाण्याने आतमध्ये येणाºयांना प्रवेश देऊ नये. संरक्षण कठड्यावरूनही कोणी आतमध्ये येणार नाही याची काळजी घेतली जावी. आवक गेटच्या बाजूला संरक्षण भिंत नसल्यामुळे तेथूनही काही महिला आतमध्ये येत असून या प्रकाराला आळा घालणे आवश्यक असल्याचे मत व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.कांदा-बटाटा आवारामध्ये कचरा वेचण्याच्या बहाण्याने कांदा चोरी केली जात असल्याचे ऐकण्यात आले आहे. याबाबत पाहणी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच अशा प्रकारा आळा घालण्यासाठी सतर्क राहण्यासंदर्भात सुरक्षा कर्मचाºयांना तत्काळ आदेशित करण्यात येईल.- कृष्णा रासकर,सहायक मुख्य सुरक्षा अधिकारी, एपीएमसी

टॅग्स :onionकांदाCrime Newsगुन्हेगारी