शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

महागाईमुळे चोरट्यांचे लक्ष कांद्यावर, एपीएमसीमध्ये चोरीचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 02:36 IST

राज्यभर सुरू असलेल्या टंचाईमुळे चोरट्यांनीही कांद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १५ ते २० महिला व मुले प्रतिदिन कांदा चोरून नेत आहेत.

नवी मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या टंचाईमुळे चोरट्यांनीही कांद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १५ ते २० महिला व मुले प्रतिदिन कांदा चोरून नेत आहेत. चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची लेखी मागणी कांदा-बटाटा अडत व्यापारी संघटनेने बाजार समिती सचिवांकडे केली आहे.मुंबईमध्ये प्रतिदिन १२०० ते १६०० टन कांद्याची मागणी आहे; परंतु सद्यस्थितीमध्ये सरासरी एक हजार टन आवक होत आहे. बुधवारी फक्त ८९६ टन आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये कांद्याचे दर ६० ते १०० रुपये झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १३० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता चोरट्यांनीही कांद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १५ ते २० महिला व काही लहान मुले कचºयात टाकलेला खराब माल उचलण्याच्या बहाण्याने मार्केटमध्ये प्रवेश करत आहेत. मालधक्याच्या बाजूला पडलेला माल उचलताना दोन्ही गाळ्यांच्या मध्ये ग्राहकांसाठी ठेवलेल्या नमुन्यांमधूनही कांदा उचलू लागल्या आहेत. याशिवाय लिलावगृहामध्ये ठेवलेल्या मालामधूनही मोठ्याप्रमाणात कांद्याची चोरी होऊ लागली आहे. प्रतिदिन १०० ते ५०० किलो माल बाहेर नेला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. व्यापाºयांचेही नुकसान होत आहे. चोरीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. व्यापाºयांनी संघटनेच्याही हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. कांदा-बटाटा अडत व्यापारी संघाने याची दखल घेऊन बाजार समिती प्रशासनास पत्र दिले आहे.बाजार आवारामध्ये टाकून दिलेला शेतमाल गोळा करण्यासाठी लहान मुले व महिला येत आहेत. गाळ्यासमोरील कचरा उचलण्याच्या बहाण्याने चांगला मालही चोरी करून घेऊन जात आहेत. या घटना वाढू लागल्या असून, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मार्केटमध्ये अशाप्रकारे कोणालाही प्रवेश दिला जाऊ नये. खरेदी पावती नसताना एक किलो मालही बाहेर घेऊन जाऊ दिला जाऊ नये. सुरक्षारक्षक संबंधितांना आतमध्ये प्रवेश देतातच का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. चोरीच्या या घटना तत्काळ थांबविण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही व्यापाºयांनी दिला आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी मुख्य सुरक्षा अधिकारी अविनाश काकडे यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.सुरक्षा व्यवस्था कडक करावीमार्केटच्या प्रवेशद्वारातून कचरा गोळा करण्याच्या बहाण्याने आतमध्ये येणाºयांना प्रवेश देऊ नये. संरक्षण कठड्यावरूनही कोणी आतमध्ये येणार नाही याची काळजी घेतली जावी. आवक गेटच्या बाजूला संरक्षण भिंत नसल्यामुळे तेथूनही काही महिला आतमध्ये येत असून या प्रकाराला आळा घालणे आवश्यक असल्याचे मत व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.कांदा-बटाटा आवारामध्ये कचरा वेचण्याच्या बहाण्याने कांदा चोरी केली जात असल्याचे ऐकण्यात आले आहे. याबाबत पाहणी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच अशा प्रकारा आळा घालण्यासाठी सतर्क राहण्यासंदर्भात सुरक्षा कर्मचाºयांना तत्काळ आदेशित करण्यात येईल.- कृष्णा रासकर,सहायक मुख्य सुरक्षा अधिकारी, एपीएमसी

टॅग्स :onionकांदाCrime Newsगुन्हेगारी