शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित युवकांनी जपली लोककला

By admin | Updated: July 6, 2017 06:37 IST

भारतीय लोककला हा आपल्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. या लोककलांमध्ये अनेक लोककला या पारंपरिक

- दाजी कोळेकर भारतीय लोककला हा आपल्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. या लोककलांमध्ये अनेक लोककला या पारंपरिक पद्धतीने जपल्या जात असून त्या एका पिढीकडून दुसऱ्या पुढच्या पिढीकडे संक्रमित होत असल्याचे दिसून येते. अशा काही लोककलांमध्ये गजनृत्य म्हणजेच कैपत नृत्य ही कला आहे. ही लोककला मुंबईसारख्या महाकाय नगरीमध्ये आजही जतन केली जात असल्याचे दिसून येते आणि तीही उच्चशिक्षित तरुण पिढीकडून शिक्षण घेत व रोजगार करत.बिरोबा देवस्थान असणारे सांगली जिल्ह्यातील आरेवाडी हे गाव या लोककलेमुळे नावारूपास येत आहे. आरेवाडीमध्ये मागील शेकडो वर्षांपासून ही लोककला जपली जात असून या गावातील रोजगारासाठी मुंबईत आलेल्या काही युवकांनी गेल्या ५० वर्षांपासून ही कला जपण्यासाठी धडपड सुरू केली. मुंबईमध्ये या लोककलेला व्यासपीठ आणि वैभव मिळवून देण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव (बापू) शेंडगे आणि मेंढपाळ कामगार नेते पांडुरंग कोळेकर यांनी मोलाचे योगदान दिले आणि त्याचाच लाभ उठवत सर्वांच्या सहकार्याने आकाराम कोळेकर यांनी ही लोककला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविली. १९८९ साली मुंबईमध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ‘अपना उत्सव’ मध्ये सहभाग घेवून वाहवा मिळविल्यानंतर ही लोककला चांगलीच चर्चेत आली आणि मुंबईच्या सांस्कृतिक वैभवातील एक महत्त्वाचा घटक बनली.अशी ही पारंपरिक लोककला घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या आणि धावपळीचे जीवन जगणाऱ्या महाकाय नगरीमध्ये आजही जपली जात आहे आणि तीही उच्चशिक्षित तरुणांकडून. मुंबईतील ५० वर्षांची परंपरा असणाऱ्या या लोककलेचा आता दुसरी पिढी वारसा चालवत आहे. या लोककलेमधील अनेक युवक अभियांत्रिकी, व्यवस्थापनातील पदवीचे शिक्षण घेत आहेत, तर काही शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रात नोकरीही करीत आहेत. पण हे करत असताना आपल्या लोककला जतनामध्ये ते कुठेही कमी पडत नाहीत. आपल्या पूर्वजांसारखे तितकेच जोमाने ही लोककला जतन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ही लोककला मुंबईच्या सांस्कृतिक वैभवात आणखी भर घालत नावारूपास येईल असेच या पिढीजात परंपरेवरून दिसून येत आहे.अनेक दिग्गजांकडून गजनृत्य कलेचे कौतुक : शेकडो वर्षांची मूळ परंपरा असलेल्या या लोकक लेने मागील ३०-४० वर्षांमध्ये मुंबईसह राज्याचे अनेक ठिकाणी प्रतिनिधित्व करत आपली लोकप्रियता वाढवली आहे. देशातील अहमदाबाद ते आसाम आणि हरियाणा ते कन्याकुमारी अशा विविध ठिकाणी पार पडलेल्या सांस्कृतिक महोत्सवांमध्ये आपली ढंगदार लोककला सादर करून वाहवा मिळविली आहे. ही लोककला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंपासून ते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक पंतप्रधानांनी व राष्ट्रपतींनी या लोककलेचा आस्वाद घेत कौतुक केले आहे. देशातील प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये आणि मोठ्या शहरवासीयांनी ही लोककला पाहिली आहे. या लोककलेच्या इतिहासामध्ये १९५८ दिल्ली दौरा, २००१ चा पहिला आंतरराष्ट्रीय इंग्लंड दौरा आणि २००९ मधील रशियाचा दौरा, हे ऐतिहासिक आणि पे्ररणादायी दौरे असल्याचे दिसून येते. १५० वर्षे राज्य केलेल्या ब्रिटिशांकडून मानाचा मुजरा : आॅगस्ट २००१ मध्ये या लोककलाकारांनी इंग्लंडमधील एडिंबर्ग आणि स्कॉटलंडमध्ये आपली कला सादर करून पहिला आंतरराष्ट्रीय दौरा केला. त्या वेळी भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या गोऱ्या साहेबांनी या कलावंतांना सलाम केला. या आंतरराष्ट्रीय दौऱ्यामध्ये मुंबईकरांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रात मुंबईसह महाराष्ट्राचा दबदबा वाढत गेला.